शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

पीकविम्याच्या पैशासाठी शेतकऱ्यांचे भजन व भोजन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:57 PM

पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला.

ठळक मुद्देसामूहिक आत्मदहन करणार : जय जय रामकृष्ण हरी.... कृषी कार्यालयात घुमला टाळ मृदंगाचा गजर

औरंगाबाद : पदरमोड करून पीकविमा भरला खरा; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ढेला आला नाही. मग आमचे पैसे गेले कुठे? फसवी योजना कुणासाठी? असे म्हणून शेतकºयांनी टाळ मृदंगावर ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी केला.शेतकºयांना पीक विमाच देणार असाल, तर त्यांच्याकडून वसुली कशाला करता, कोट्यवधींचा विमा जमा करून नुकसान होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया कंपनी व शासकीय यंत्रणेच्या अधिकाºयांवरही कारवाई करण्याची गरज आहे. जिल्ह्यात २ लाख २० हजार शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. ज्यांना विमा मंजूर झाला आहे, त्यांच्या खात्यात पैसे का आले नाही, तांत्रिक बाबींचा खुलासा अधिकाºयांनी करावा, खाजगी कंपनीला पाठीशी घालून चालणार नाही. फळ पीकविमादेखील शेतकºयांना द्यावा. दि. १५ जूनपर्यंत शेतकºयांच्या खात्यात विम्याचे पैसे आले नाही, तर कायगाव टोका येथे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला.टाळ मृदंगावर भजनअण्णासाहेब जाधव (मनसे), अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी, शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, जनक्रांती सेनेचे अजय साळुंके, कृष्णा शेलार, धनसिंग राजपूत, डॉ. त्यागी, भास्कर झिरपे, भाऊसाहेब गायके, विक्रम चव्हाण आदींसह शेकडो शेतकºयांनी सहभाग नोंदवून भजन व भोजन आंदोलन केले. शेवटी कृषी अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmer strikeशेतकरी संप