शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 16:12 IST

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सेनगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ फिटता फिटेना बुधवारी रात्री   तालुक्यातील  चिंचखेडा, आमदरी, लिंबाला, तांदलवाडी, बोडखा, येलदरी, सुकळी,खुडज ,पुसेगाव ,सेनगाव आदी भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात काही ठिकाणी अक्षरशः गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या असमतोलपणामुळे मेटाकुटिला आला आहे. खरीप हंगामात काढणीचा वेळी अतिवृष्टी झाला ने सोयाबीन, तुर, कापूस आदी पिकांचे प्रचंड मोठे  नुकसान झाले असताना. रब्बी पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस ,गारानी झोडपून काढले आहे. मगळवारी रात्री तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.या पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले .परंतु बुधवारी रात्री तालुक्यातील सर्वच भागात जोरदार गारासह पाऊस झाला .तब्बल तासभर झालेल्या पावसाने शेतात उभे तसेच काढून ठेवलेल्या गहू,हरभरा आदी

पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काही तासांच्या गारपिटीमुळे तोंडचा घास तालुक्यातील रावून घेतला गेला आहे.गारपिटीमुळे चिंचखेडा,येलदरी,सुकळी खु,सुकळी बु या परिसरातील शेतात गाराचा खच झाला.उभा असलेला गहु,हरभरा जागेवरच आडवा झाला. त्या मुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, मागील चार पाच वर्षापासून या भागात गारपीट ही रब्बी हंगामात नित्याची होऊन बसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे,  खरीपातील  सोयाबीन अतिवृष्टी मुळे उध्वस्त झाले . आता गहू, हरभरा ज्वारी नगदी पिके हातची गेल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे .  फळबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे .या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस