शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठावरील शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:37 IST

अनधिकृत पाणी उपसा भोवणार : ३५० जणांवर पोलीस कारवाईची टांगती लतवार

गंगापूर : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या ३२ गावांतील ३०० ते ३५० शेतकºयांवर जायकवाडी प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने शेतकºयांनी धसका घेतला आहे.जायकवाडीच्या जलफुगवट्यातून पाणी उचलण्याची परवानगी नसणाºया शेतकºयांवर सदर कारवाई होणार असून या संदर्भात संबंधित विभागाने मागील महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन शेतकºयांना पाणी प्रस्ताव दाखल करून परवानगी घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, काही शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली, मात्र अजूनही अनेक शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली नाही. अशा शेतकºयांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली .सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी पाटबंधारे पैठण विभागांतर्गत येणाºया गंगापूर शाखेतर्फे सदर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी काही शेतकºयांसह पोलीस ठाणे गाठले होते. शेतकºयांनी कारवाईसंदर्भात लगेच निर्णय न घेता अजून एका महिना सवलत द्यावी, या कालावधीत पाणी परवानगी काढून घेऊ, असे सांगून वेळ मागून घेतली. मात्र, विभागाचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेतकºयांचे म्हणणे...सध्या कांद्याला बाजारभाव नाही, उसाचे देखील वांधे झाले आहेत. उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी कारखानदारांकडे चकरा मारत आहेत. या शिवाय ज्या शेतकºयांचा ऊस गेला, त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत पैसे उपलब्ध होणार कसे, या विवंचनेत शेतकरी असतानाच पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे शेतकºयामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संबंधित विभागाकडून सुरुवातीला प्रति कनेक्शन १२०० रूपयांची मागणी करण्यात आली होती. आता मात्र यात वाढ करुन २२०० रूपयांची मागणी करण्यात येत आहे. सदर मागणी अवाजवी असल्याचे येथे शेतकरी देविदास वाघ म्हणाले. यावेळी जामगाव व कायगाव येथील शेतकरी उपस्थित होते. या कारवाईमुळे शेतकरी भांबावले असून संबंधित विभागास शेतकºयांच्या उद्रेकाला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या गावात होणार कारवाईगंगापूर तालुक्यातील जामगाव, नेवरगाव, बगडी, हैबतपूर, ममदापूर, कायगाव, नवाबपूर, गणेशवाडी, अमळनेर, लखमापूर, गळनिंब, आगरवाडगाव, सावखेडा, मांडवा आदींसह ३२ गावातील ३०० ते ३५० शेतकºयाविरोधात कारवाई होणार असल्याने संबंधित विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातRevenue Departmentमहसूल विभाग