शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

गोदाकाठावरील शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:37 IST

अनधिकृत पाणी उपसा भोवणार : ३५० जणांवर पोलीस कारवाईची टांगती लतवार

गंगापूर : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या ३२ गावांतील ३०० ते ३५० शेतकºयांवर जायकवाडी प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने शेतकºयांनी धसका घेतला आहे.जायकवाडीच्या जलफुगवट्यातून पाणी उचलण्याची परवानगी नसणाºया शेतकºयांवर सदर कारवाई होणार असून या संदर्भात संबंधित विभागाने मागील महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन शेतकºयांना पाणी प्रस्ताव दाखल करून परवानगी घेण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, काही शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली, मात्र अजूनही अनेक शेतकºयांनी पाणी परवानगी घेतली नाही. अशा शेतकºयांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली .सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी पाटबंधारे पैठण विभागांतर्गत येणाºया गंगापूर शाखेतर्फे सदर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी काही शेतकºयांसह पोलीस ठाणे गाठले होते. शेतकºयांनी कारवाईसंदर्भात लगेच निर्णय न घेता अजून एका महिना सवलत द्यावी, या कालावधीत पाणी परवानगी काढून घेऊ, असे सांगून वेळ मागून घेतली. मात्र, विभागाचे अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.शेतकºयांचे म्हणणे...सध्या कांद्याला बाजारभाव नाही, उसाचे देखील वांधे झाले आहेत. उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी कारखानदारांकडे चकरा मारत आहेत. या शिवाय ज्या शेतकºयांचा ऊस गेला, त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत पैसे उपलब्ध होणार कसे, या विवंचनेत शेतकरी असतानाच पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे शेतकºयामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संबंधित विभागाकडून सुरुवातीला प्रति कनेक्शन १२०० रूपयांची मागणी करण्यात आली होती. आता मात्र यात वाढ करुन २२०० रूपयांची मागणी करण्यात येत आहे. सदर मागणी अवाजवी असल्याचे येथे शेतकरी देविदास वाघ म्हणाले. यावेळी जामगाव व कायगाव येथील शेतकरी उपस्थित होते. या कारवाईमुळे शेतकरी भांबावले असून संबंधित विभागास शेतकºयांच्या उद्रेकाला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या गावात होणार कारवाईगंगापूर तालुक्यातील जामगाव, नेवरगाव, बगडी, हैबतपूर, ममदापूर, कायगाव, नवाबपूर, गणेशवाडी, अमळनेर, लखमापूर, गळनिंब, आगरवाडगाव, सावखेडा, मांडवा आदींसह ३२ गावातील ३०० ते ३५० शेतकºयाविरोधात कारवाई होणार असल्याने संबंधित विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नव्हता.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातRevenue Departmentमहसूल विभाग