शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकरी कर्जबाजारी

By admin | Updated: May 13, 2014 01:07 IST

जळकोट : तालुक्यातील शेतकरी यंदा पूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसासह, गारपीट, वादळी वारा यामुळे पूर्णत: हैराण झाला.

जळकोट : तालुक्यातील शेतकरी यंदा पूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसासह, गारपीट, वादळी वारा यामुळे पूर्णत: हैराण झाला असून पुढील खरिप हंगामात जमिनीला अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याने शेतकरी कर्जाच्या छायेत अडकणार असल्याची भीती व्यक्त करत आहे. तालुक्यात उन्हाळा चालू झाल्यापासून वादळ वारा, अवकाळी पाऊस, गारपीटांनी हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा तडाखा त्यानंतर सायंकाळी वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिके घेतलेल्या पिकांवर नांगर फिरुन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावर शासनाने शेतकर्‍यांला मदतीपासून वंचित ठेवले. पूर्वीच कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा कर्जाचा डोंगर वाढून कर्जबाजारी झाला. येणार्‍या खरिप हंगामात शेतीची मशागत करून पेरणी करावे या हेतूने उभा टाकावा असे वाटू लागले होते. परंतु अवकाळी पाऊस आणि वादळी वारे शेतकर्‍यांचा पाठलाग काही सोडत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी या संकटाला आधीच घाबरुन गेला असता हवामान खातेही शेतकर्‍यांच्या छातीवर पुन्हा वजन टाकत यावर्षी पावसाळा हा कमी तथा मध्यम स्वरुपाचा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे रब्बी पिके अवकाळी पावसाने नेली आता खरीप पिकांवर तर काही तरी करून डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल या आशेने बसलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर आधीच शासनाने अनुदान न देता मीठ टाकले आहे. पुन्हा निसर्ग मीठ टाकेल का अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहे.जळकोट येथील पंचागकर्ते राजकुमार जोशी यांनी सांगितले की, यावर्षी शेतीचे उत्पन्नात घट होणार असून, पाणी यावर्षी कमी पडले, काही ठिकाणी तुरळक पाणीटंचाई भासणार आहे. यंदा जून अखेर चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असून आॅगस्टमध्ये पाऊस समाधानकारक राहील. त्यानंतर काही ठिकाणी पावसाचा जोर राहील तर काही ठिकाणी कोरडे राहील असा अंदाज व्यक्त करत यावर्षी पावसाळा संमिश्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)