शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कापसावरही ‘जीएसटी’ लागू झाल्याने शेतक-यांना फटका तर व्यापा-यांमध्ये गोंधळाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 17:47 IST

केंद्र सरकारने  जीएसटी कायद्याच्या तरतुदीत बदल केला असून आता जिनिंगसाठी कापसाची खरेदी करणा-या व्यापा-यांनाही पाच टक्के सेवा कर द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देया बदलाची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. आधीच कमी भावामुळे हैराण झालेल्या शेतक-यांना पांढ-या सोन्यातही जीएसटीचा फटका सहन करावा लागणार आहे. जीएसटीबाबत वेळोवेळी जारी होत असलेल्या बदलांच्या अधिसुचनेमुळे व्यापा-यांत गोंधळाचे वातावरण आहे.

वैजापूर (औरंगाबाद ) : केंद्र सरकारने  जीएसटी कायद्याच्या तरतुदीत बदल केला असून आता जिनिंगसाठी कापसाची खरेदी करणा-या व्यापा-यांनाही पाच टक्के सेवा कर द्यावा लागणार आहे. या बदलाची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत. यामुळे आधीच कमी भावामुळे हैराण झालेल्या शेतक-यांना पांढ-या सोन्यातही जीएसटीचा फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान, जीएसटीबाबत वेळोवेळी जारी होत असलेल्या बदलांच्या अधिसुचनेमुळे व्यापा-यांत गोंधळाचे वातावरण आहे.

वैजापूर तालुक्यात कापसाचे मोठे क्षेत्र आहे.  तालुक्यातून दररोज अंदाजे दहा हजार क्विंटल कापूस गुजरात राज्यात पाठवला जातो तर जवळपास पाच हजार क्विंटल कापूस तालुक्यात सुरु असलेल्या तीन जिनिंग मिलमध्ये पाठवला जातो. यातून शेतकरी, व्यापारी व जीएसटी कराच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते.  सध्या वैजापूर शहर व ग्रामीण भागात कापसाला प्रति क्विंटल चार हजार ते ४२०० रुपये भाव मिळत आहे. येथील उद्योजक शांतीलाल पहाडे यांच्या घायगाव शिवारातील भाग्योदय जिनिंगमध्ये ए दर्जाच्या कापसाला साडेचार हजार व बी दर्जाच्या कापसाला चार हजार दोनशे रुपयांचा भाव आहे. त्यामुळे या मिलमध्ये सध्या कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक आहे. सरकारने जीएसटीमध्ये रॉ कापसाचा समावेश केल्याने आम्हाला शेतक-यांना प्रतिक्विंटल साधारणपणे दोनशे रुपये कमी भाव द्यावा लागेल, असे पहाडे यांनी सांगितले. सरकारने कापसाच्या खरेदीवरसुद्धा जीएसटीचा बोजा टाकल्याने शेतक-यांचे नुकसान होणार असून त्याचा फटका काही प्रमाणात व्यापा-यांनाही बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

४५०० वरच स्थिरावला कापसाचा भावयंदा विविध कारणांनी  शेतक-यांना कापूस पिकावर मोठा खर्च करावा लागला. यातच आता अधिक मजुरी देत महिलांकडून कापसाची वेचणी करावी लागत आहे. अशा स्थितीत कापसाला ६ हजार रुपये भाव मिळेल, या आशेवर असलेल्या शेतक-याला केवळ ४४०० ते ४५०० रुपये क्विंटल भाव खासगी व्यापारी देत आहे. यामुळे शासनाकडून कापूस उत्पादक शेतकºयांची मोठी कुचंबणा होत आहे.

शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडलेकापूस वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतक-यांना लागली आहे. बाजारपेठेतही भाव मिळत नसल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तालुक्यात कापसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मात्र, यंदा कापूस उत्पादक शेतकरी मजुरांअभावी त्रस्त झाले आहेत. मजुरीचा दर सव्वाशे रुपयांचा २०० रुपयांवर जावून पोहचला आहे. तर कापूस वेचणीसाठी ७ ते ८ रुपये किलो दर द्यावा लागत आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्चच अधिक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजुरीसोबतच वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. कापूस निघाल्यानंतरही बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतक-यांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस