शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी लै भारी; गव्हाचे हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम

By बापू सोळुंके | Updated: March 31, 2023 18:49 IST

कृषी विभागाची स्पर्धा: शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात.

छत्रपती संभाजीनगर: लहरी निसर्गावर मात करीत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी कृषी विभागाने गतवर्षी रब्बी हंगामासाठी घेतलेल्या स्पर्धेत गहू उत्पादनात राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. हारदे यांनी हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेतले.

शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीचे अधिकारी करीत असतात. गेल्या काही वर्षापासून कृषी विभागाच्यावतीने राज्यातील  शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पीक उत्पादन स्पर्धा घेण्यात आली होती. विविध गहू या सर्वसाधारण  कॅटेगिरीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच कृषी विभागाने जाहिर केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे राज्यात प्रथम आले आहे . तर हेक्टरी ७६क्विटल उत्पादन घेऊन  सोमनाथ संपत पेखळे(रा.माडसावंगी,ता.नाशिक ) यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. तर नाशिक जिल्ह्यातीलच वासळी येथील श्रीराम किसन मते हे राज्यात तिसरे आले आहेत. त्यांनी हेक्टरी ७५क्विंटल उत्पादन घेतले.  हारदे यांनी हेक्टरी  खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील प्रगतीशील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडे ३५ एकर शेती आहेत. पोक्रा योजनेंतर्गत त्यांनी शेततळी, ठिबक सिंचन, शेडनेट आदी विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी त्यांना मार्गदर्शन करीत असतात. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गहू कॅटेगिरीमध्ये कृषी उत्पादन स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी  या स्पर्धेत सहभाग नाेंदविला हाेता.

नियोजनबद्ध लागवड केलीगतवर्षी आम्ही केशवपुष्प ऍग्रो इंडिया कंपनीचे २० किलो बियाणे वापरुन अर्धा एकरवर गहू पेरला होता. पारंपारिक पद्धतीने पेरणी न करता त्यांनी चार इंज अंतरावर दोन कोम्ब याप्रमाणे गव्हाची लावणी केली. तसेच दोन  सरीमध्ये १२ इंचाचे अंतर ठेवले. पेरणीपूर्वी  पाच ट्रॉली शेणखत टाकले होते. पेरणीनंतर बुरशीनाशक, तणनाशकची प्रत्येकी एक फवारणी केली. एक गोणी डिएपी तर एक गोणी युरीयाची टाकले.  प्रती गुंठा ७८ किलो याप्रमाणे २० गुंठे क्षेत्रात१६ क्विंटल उत्पादन झाले.- राजू आसाराम हारदे, शेतकरी 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद