शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी लै भारी; गव्हाचे हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम

By बापू सोळुंके | Updated: March 31, 2023 18:49 IST

कृषी विभागाची स्पर्धा: शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात.

छत्रपती संभाजीनगर: लहरी निसर्गावर मात करीत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी कृषी विभागाने गतवर्षी रब्बी हंगामासाठी घेतलेल्या स्पर्धेत गहू उत्पादनात राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. हारदे यांनी हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेतले.

शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीचे अधिकारी करीत असतात. गेल्या काही वर्षापासून कृषी विभागाच्यावतीने राज्यातील  शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पीक उत्पादन स्पर्धा घेण्यात आली होती. विविध गहू या सर्वसाधारण  कॅटेगिरीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच कृषी विभागाने जाहिर केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे राज्यात प्रथम आले आहे . तर हेक्टरी ७६क्विटल उत्पादन घेऊन  सोमनाथ संपत पेखळे(रा.माडसावंगी,ता.नाशिक ) यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. तर नाशिक जिल्ह्यातीलच वासळी येथील श्रीराम किसन मते हे राज्यात तिसरे आले आहेत. त्यांनी हेक्टरी ७५क्विंटल उत्पादन घेतले.  हारदे यांनी हेक्टरी  खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील प्रगतीशील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडे ३५ एकर शेती आहेत. पोक्रा योजनेंतर्गत त्यांनी शेततळी, ठिबक सिंचन, शेडनेट आदी विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी त्यांना मार्गदर्शन करीत असतात. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गहू कॅटेगिरीमध्ये कृषी उत्पादन स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी  या स्पर्धेत सहभाग नाेंदविला हाेता.

नियोजनबद्ध लागवड केलीगतवर्षी आम्ही केशवपुष्प ऍग्रो इंडिया कंपनीचे २० किलो बियाणे वापरुन अर्धा एकरवर गहू पेरला होता. पारंपारिक पद्धतीने पेरणी न करता त्यांनी चार इंज अंतरावर दोन कोम्ब याप्रमाणे गव्हाची लावणी केली. तसेच दोन  सरीमध्ये १२ इंचाचे अंतर ठेवले. पेरणीपूर्वी  पाच ट्रॉली शेणखत टाकले होते. पेरणीनंतर बुरशीनाशक, तणनाशकची प्रत्येकी एक फवारणी केली. एक गोणी डिएपी तर एक गोणी युरीयाची टाकले.  प्रती गुंठा ७८ किलो याप्रमाणे २० गुंठे क्षेत्रात१६ क्विंटल उत्पादन झाले.- राजू आसाराम हारदे, शेतकरी 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद