शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

मोसंबी बाग जगविण्यासाठी शेतकऱ्याने साडेपाच लाख रुपयांचे पाणी घेतले विकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 20:20 IST

लासुर स्टेशन परिसरातील शेतकर्यांचे हंगामी पिके सोडल्यास मोसंबी फळबाग मुख्य बागायती पीक आहे.

लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : पाचशे मोसंबीची झाडे वाचविण्यासाठी साडेपाच लाख रुपयांचे पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे लासुर स्टेशन परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. एवढे करून यंदाचे भागले परंतु पुढच्या वर्षीचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे तसाच उभा आहे.

लासुर स्टेशन परिसरातील शेतकर्यांचे हंगामी पिके सोडल्यास मोसंबी फळबाग मुख्य बागायती पीक आहे. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे या भागातील अनेक मोसंबीच्या बागा जळून जात आहेत. अशा परिस्थितीत बाग वाचवण्यासाठी लाखो रूपये खर्च येत आहे. त्यासाठी काहींनी पाच ते दहा लाख रुपये किमतीचे सहा टायर किंवा दहा टायर ट्रक खरेदी करून त्यावर टँकर बसविले आहे. तर, काहींनी शेततळ्यातील पाणी विकत घेऊन पाणी टंचाईवर मात करण्याचा  प्रयत्न सुरू ठेवला आहे. 

शिरेगाव येथील शेतकरी विश्वनाथ गणपत कुकलारे यांच्याकडे फळांवर असलेले पाचशे मोसंबीचे झाडे आहेत. ती झाडे जतन करण्यासाठी त्यांच्या कडील सर्व पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले. त्यामुळे त्यांनी एका शेतकऱ्याकडील एक एकर क्षेञाच्या शेततळ्यातील पाण्याला तब्बल साडे चार लाख रुपये मोजले. त्यानंतर १ लाखाची पाईपलाईन केली. यामुळे यावर्षी कशीबशी त्यांची बाग जिवंत राहिली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरीagricultureशेती