शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

प्रल्हाद मोदींसमोर नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांचा मोर्चा

जाहीर सभेचा बनला राजकीय आखाडा :प्रल्हाद मोदी-अब्दुल सत्तार यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदीसत्तार तावातावात निधून गेले सभेतून‘विषयावर’ बोला असे बजावले एका प्रेक्षकाने!औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.‘डीबीटी रद्द करा, पैसे नको, धान्य हवे,’ अशा घोषणा देत आज दुपारी औरंगाबाद जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक व शिधापत्रिकाधारकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौकापासून सुरू झालेला हा मोर्चा आमखास मैदानावर सभेत रूपांतरित झाला. एका उघड्या जीपमध्ये उभे राहून प्रल्हाद मोदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. समवेत अन्य पदाधिकारीही होते. पंतप्रधानांचे भाऊच मोर्चात असल्याने पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता.मोर्चातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या होत्या. आमखास मैदानावरील जाहीर सभेत तर राजकीय जुगलबंदीच बघायला मिळाली आणि तीही प्रल्हाद मोदी व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यात!त्याचे असे झाले की, शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव विलास भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या वतीने संतोष माने व जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या वतीने कृष्णा पाटील डोणागावकर हे या सभेत मंचावर बसले होते. त्यांची भाषणेही झाली. दरम्यान खा. चंद्रकांत खैरे यांचा जाहीर पाठिंबा मोबाईलद्वारे ऐकवण्याचा प्रयत्न झाला; पण तो अयशस्वी ठरला.‘वो सरकार निकम्मी है... वो सरकार बदलनी है...’ चौकटनागपूरचे आर. एस. अंबुलकर यांनी सर्व राजकीय पक्षांनी डीबीटीचा प्रश्न हाताळावा, असे आवाहन करीत ‘वापस लो वासप लो... डीबीटी वापस लो’, ‘रेशन आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं’, ‘रोजी रोटी दे न सकी, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है,’ अशा घोषणा दिल्या व त्या उपस्थितांकडून वदवून घेतल्या.सभा सुरू होताच एक महिला स्टेजजवळ आली आणि म्हणाली, ‘आधी पुड्या बंद करा. कॅन्सर होऊन पोरं मरायला लागली;’ पण तिचे म्हणणे कुणी विचारातच घेतले नाही. सविता मोकळे या कार्डधारक महिलेचे भाषण मोठे रंजक झाले. तिनेही नरेंद्र मोदी यांचे नाव घेत टीका केली. डीबीटी लागू झाल्यास रेशनवर गहू २० रुपये किलो व तांदूळ २७ रुपये किलो अशा चढ्या भावाने विकले जाणार असल्याचा इशारा डी.एन. पाटील यांनी यावेळी दिला, तर रॉकेल ६२ रुपयांनी विकले जाणार आहे. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलन