शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्रल्हाद मोदींसमोर नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांचा मोर्चा

जाहीर सभेचा बनला राजकीय आखाडा :प्रल्हाद मोदी-अब्दुल सत्तार यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदीसत्तार तावातावात निधून गेले सभेतून‘विषयावर’ बोला असे बजावले एका प्रेक्षकाने!औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.‘डीबीटी रद्द करा, पैसे नको, धान्य हवे,’ अशा घोषणा देत आज दुपारी औरंगाबाद जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक व शिधापत्रिकाधारकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौकापासून सुरू झालेला हा मोर्चा आमखास मैदानावर सभेत रूपांतरित झाला. एका उघड्या जीपमध्ये उभे राहून प्रल्हाद मोदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. समवेत अन्य पदाधिकारीही होते. पंतप्रधानांचे भाऊच मोर्चात असल्याने पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता.मोर्चातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या होत्या. आमखास मैदानावरील जाहीर सभेत तर राजकीय जुगलबंदीच बघायला मिळाली आणि तीही प्रल्हाद मोदी व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यात!त्याचे असे झाले की, शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव विलास भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या वतीने संतोष माने व जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या वतीने कृष्णा पाटील डोणागावकर हे या सभेत मंचावर बसले होते. त्यांची भाषणेही झाली. दरम्यान खा. चंद्रकांत खैरे यांचा जाहीर पाठिंबा मोबाईलद्वारे ऐकवण्याचा प्रयत्न झाला; पण तो अयशस्वी ठरला.‘वो सरकार निकम्मी है... वो सरकार बदलनी है...’ चौकटनागपूरचे आर. एस. अंबुलकर यांनी सर्व राजकीय पक्षांनी डीबीटीचा प्रश्न हाताळावा, असे आवाहन करीत ‘वापस लो वासप लो... डीबीटी वापस लो’, ‘रेशन आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं’, ‘रोजी रोटी दे न सकी, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है,’ अशा घोषणा दिल्या व त्या उपस्थितांकडून वदवून घेतल्या.सभा सुरू होताच एक महिला स्टेजजवळ आली आणि म्हणाली, ‘आधी पुड्या बंद करा. कॅन्सर होऊन पोरं मरायला लागली;’ पण तिचे म्हणणे कुणी विचारातच घेतले नाही. सविता मोकळे या कार्डधारक महिलेचे भाषण मोठे रंजक झाले. तिनेही नरेंद्र मोदी यांचे नाव घेत टीका केली. डीबीटी लागू झाल्यास रेशनवर गहू २० रुपये किलो व तांदूळ २७ रुपये किलो अशा चढ्या भावाने विकले जाणार असल्याचा इशारा डी.एन. पाटील यांनी यावेळी दिला, तर रॉकेल ६२ रुपयांनी विकले जाणार आहे. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलन