शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आमने-सामने: केवळ नामांतराने शहरांच्या विकासाचे प्रश्न सुटतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:11 IST

शहरांच्या नामांतराची मागणी अधूनमधून होत असते. सत्तेतील पक्ष निर्णय घेत नाहीत. मात्र, केवळ नामांतराने विकासाचे प्रश्न सुटतील का? 

शहरांच्या नामांतराची मागणी अधूनमधून होत असते. सत्तेतील पक्ष निर्णय घेत नाहीत. मात्र, केवळ नामांतराने विकासाचे प्रश्न सुटतील का? आ. अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्तेऔरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण करणे ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे, त्यात काहीही बदल होणार नाही. छत्रपती संभाजी महाराज आधुनिक विकासाचे विचारवंत होते, ते नुसते योद्धा नव्हते. आजही शिवकालीन बंधारे आहेत. त्यांच्या काळातील बारवा, जलयोजना कार्यरत आहेत. संभाजी महाराजांच्या काळात रयतेला सुविधा देण्याच्या अनेक योजना राबविल्या गेल्या. शेतसारा, कर्जमाफीसारख्या योजनांचा आजही उल्लेख होतो. त्यामुळे संभाजीनगर असे नामकरण करण्यापूर्वी सर्व सुविधा जनतेला मिळाव्यात, अशी भूमिका शिवसेनेची आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी सुखसमृद्धी आणि नंतर संभाजीनगर, अशी भावना व्यक्त करण्यामागे विकासाची भावना आहे. शिवसेनाप्रमुखांनी संभाजीनगर नामकरणाचे वचन दिलेले आहे. ते मी पूर्ण करणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना सांगितले आहे. त्यातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे. मंत्रिमंडळात नामकरणाचा निर्णय झाला. सुरुवात म्हणून विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला. परंतु, केंद्र शासन निर्णय घेत नसल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.  

प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद औरंगाबादच्या नामकरणाची जाहीर भूमिका दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते करण्याची संधी होती. मात्र, ते तर फक्त बोलण्याचेच काम करत आहेत. इथल्या सभेत नामकरणाबाबत भाष्य करतील असे वाटले होते. प्रत्यक्षात मी म्हणतो म्हणजे नामकरण झालेच, केंद्राने हे करावे-ते करावे, आधी विमानतळाला नाव द्या, असली जबाबदारी झटकण्याची भाषा केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखवत जबाबदारी झटकायची, प्रश्नाला बगल देत पळ काढायचाच प्रयत्न दिसतो आहे. औरंगाबादच्या पाण्याचा, रस्त्याचा, कचऱ्याचा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अडीच वर्षांच्या काळात या प्रश्नांवर काय काम केले, याची माहिती पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यायला हवी. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात १,६०० कोटींची कामे मंजूर झाली होती, तीसुद्धा रखडवली. आता स्थानिक निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे २५० कोटींची घोषणा केली. पण, सामान्य जनतेलाही आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणांचा अर्थ समजतो. विकासकामांची भूकच नाही, याची जनतेला आता खात्री पटली आहे. नाहीतर अडीच वर्षांत नामकरणासह विकासाची अनेक कामे पूर्ण करता आली असती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद