शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जगातील अनेक देशांत नेत्रदान बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:10 IST

अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते.

ठळक मुद्देभारतातही व्हावा विचार : नेत्रतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचा समारोप

औरंगाबाद : अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते. अंध व्यक्तींची संख्या पाहता भारतातही मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीचे नेत्रदान करण्याचा विचार होण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.महाराष्ट्र आॅप्थेल्मोलॉजिकल सोसायटी, मराठवाडा आॅप्थेल्मोलॉजिकल सोसायटी आणि औरंगाबाद आॅप्थेल्मोलॉजिकल असोसिएशनच्या वतीने एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात आयोजित नेत्ररोग तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. परिषदेत देश-विदेशांतील नेत्रतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जगभराच्या तुलनेत २५ टक्के अंध भारतात आहेत. त्यामुळे नेत्रदानासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जाते. भारतात नेत्रदान हे ऐच्छिक म्हणजे व्यक्ती आणि मृत्यूनंतर कुटुंबाच्या संमतीने होते. परंतु अनेक देशांत नेत्रदान हे बंधनकारक आहे. भारतात ज्येष्ठ व्यक्तींच्या नेत्रदानाचे प्रमाण अधिक आहे. परंतु अनेकदा असे नेत्र फारसे उपयोगी ठरत नसल्याची चिंताही तज्ज्ञांनी व्यक्त केली.परिषदेत १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचे परिषदेत थेट प्रक्षेपणही करण्यात आले. परिषद यशस्वीतेसाठी आयोजन समितीच्या प्रमुख डॉ. सुनयना मलिक, सचिव डॉ. राजीव मुंदडा, वैज्ञानिक समिती प्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर जोशी, कोषाध्यक्ष डॉ. धनंजय मावरे, औरंगाबाद नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील कसबेकर, सचिव डॉ. अनंत पिंपरकर, कोषाध्यक्ष डॉ. केदार नेमीवंत आदींनी प्रयत्न केले.नवे तंत्रज्ञान आत्मसातराज्यभरातून तेराशेपेक्षा अधिक तज्ज्ञांनी परिषदेत सहभाग नोंदविला. ४० वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर अनेक नवीन तंत्रज्ञान आलेले आहे. परिषदेच्या माध्यमातून माझ्यासह प्रत्येक सहभागी डॉक्टरांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता आले, असे आयोजन समितीच्या प्रमुख डॉ. सुनयना मलिक म्हणाल्या.गुणवत्तापूर्ण उपचारकमी शुल्कात रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या दृष्टीने परिषद महत्त्वपूर्ण ठरली. मराठवाड्यातील नेत्ररुग्णांना याचा आगामी कालावधीत नक्कीच फायदा होईल, असे डॉ. राजीव मुंदडा म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिक