शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

एसटी महामंडळात पैशांची उधळपट्टी, चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:30 IST

एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

एसटी महामंडळातील कर्मचाºयांचा गणवेश गेली अनेक वर्षे एकसारखा होता; परंतु कर्मचाºयांच्या वर्गवारीनुसार गणवेश करून कोणाचे तरी हित जोपसण्यात आले. आजपर्यंत गणवेशावर १३ कोटींचा खर्च होत आहे. हा खर्च आता ७५ कोटींवर गेला. साफसफाईचा खर्चही ५० कोटींवरून ४४७ कोटींवर गेला. खाजगी मालकीच्या सातशे शिवशाही बस घेण्यात आल्या. पुन्हा ४०० बसची आॅर्डर देण्यात आली आहे. सध्या ७८ स्लीपर बस आलेल्या आहेत. दुप्पट दरामुळे तोटा होत आहे. त्यामुळे या बस उभ्या करून ठेवल्या तरी परवडतील, असे तिगोटे म्हणाले.

एसटी महामंडळाचा संचित तोटा ३ हजार ६०० कोटींवर गेला आहे. दरवर्षी ५०० कोटींचा तोटा वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत एकाही चेसिसची खरेदी झाली नाही. त्यामुळे बसेस स्कॅ्रप होण्याचे प्रमाण वाढले असून, ‘लालपरी’ची ओळख धोक्यात आली आहे. ७ हजार ९०० कोटींचे उत्पन्न असलेल्या एसटी महामंडळाचा वार्र्षिक खर्च ८ हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घेतलेल्या निर्णयाची, कामांची आणि खर्चाची चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी,अशी मागणी मुकेश तिगोटे यांनी केली. यावेळी सचिन सिरसाट, गिरीश गडप्पा, निसार पठाण, दत्तात्रय कातार आदी उपस्थित होते.

किमान सहा हजारांची वाढएसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन दिले पाहिजे. १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी व शासकीय कर्मचाºयांच्या वेतनात तफावत निर्माण झाली आहे. किमान सहा हजार रुपये वाढले, तर ही तफावत दूर होईल. ही वेतनवाढ देण्यात यावी, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मुकेश तिगोटे म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद