शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

एसटी महामंडळात पैशांची उधळपट्टी, चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:30 IST

एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

एसटी महामंडळातील कर्मचाºयांचा गणवेश गेली अनेक वर्षे एकसारखा होता; परंतु कर्मचाºयांच्या वर्गवारीनुसार गणवेश करून कोणाचे तरी हित जोपसण्यात आले. आजपर्यंत गणवेशावर १३ कोटींचा खर्च होत आहे. हा खर्च आता ७५ कोटींवर गेला. साफसफाईचा खर्चही ५० कोटींवरून ४४७ कोटींवर गेला. खाजगी मालकीच्या सातशे शिवशाही बस घेण्यात आल्या. पुन्हा ४०० बसची आॅर्डर देण्यात आली आहे. सध्या ७८ स्लीपर बस आलेल्या आहेत. दुप्पट दरामुळे तोटा होत आहे. त्यामुळे या बस उभ्या करून ठेवल्या तरी परवडतील, असे तिगोटे म्हणाले.

एसटी महामंडळाचा संचित तोटा ३ हजार ६०० कोटींवर गेला आहे. दरवर्षी ५०० कोटींचा तोटा वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत एकाही चेसिसची खरेदी झाली नाही. त्यामुळे बसेस स्कॅ्रप होण्याचे प्रमाण वाढले असून, ‘लालपरी’ची ओळख धोक्यात आली आहे. ७ हजार ९०० कोटींचे उत्पन्न असलेल्या एसटी महामंडळाचा वार्र्षिक खर्च ८ हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घेतलेल्या निर्णयाची, कामांची आणि खर्चाची चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी,अशी मागणी मुकेश तिगोटे यांनी केली. यावेळी सचिन सिरसाट, गिरीश गडप्पा, निसार पठाण, दत्तात्रय कातार आदी उपस्थित होते.

किमान सहा हजारांची वाढएसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन दिले पाहिजे. १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी व शासकीय कर्मचाºयांच्या वेतनात तफावत निर्माण झाली आहे. किमान सहा हजार रुपये वाढले, तर ही तफावत दूर होईल. ही वेतनवाढ देण्यात यावी, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मुकेश तिगोटे म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद