शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

एसटी महामंडळात पैशांची उधळपट्टी, चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:30 IST

एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : एसटी महामंडळात सध्या पैशांची उधळपट्टी सुरूआहे. कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी खर्च केला जात आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करीत एसटी महामंडळाचे अध्यक्षपद व परिवहनमंत्रीपद एकाच व्यक्तीकडे असल्याने कामगारांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

एसटी महामंडळातील कर्मचाºयांचा गणवेश गेली अनेक वर्षे एकसारखा होता; परंतु कर्मचाºयांच्या वर्गवारीनुसार गणवेश करून कोणाचे तरी हित जोपसण्यात आले. आजपर्यंत गणवेशावर १३ कोटींचा खर्च होत आहे. हा खर्च आता ७५ कोटींवर गेला. साफसफाईचा खर्चही ५० कोटींवरून ४४७ कोटींवर गेला. खाजगी मालकीच्या सातशे शिवशाही बस घेण्यात आल्या. पुन्हा ४०० बसची आॅर्डर देण्यात आली आहे. सध्या ७८ स्लीपर बस आलेल्या आहेत. दुप्पट दरामुळे तोटा होत आहे. त्यामुळे या बस उभ्या करून ठेवल्या तरी परवडतील, असे तिगोटे म्हणाले.

एसटी महामंडळाचा संचित तोटा ३ हजार ६०० कोटींवर गेला आहे. दरवर्षी ५०० कोटींचा तोटा वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत एकाही चेसिसची खरेदी झाली नाही. त्यामुळे बसेस स्कॅ्रप होण्याचे प्रमाण वाढले असून, ‘लालपरी’ची ओळख धोक्यात आली आहे. ७ हजार ९०० कोटींचे उत्पन्न असलेल्या एसटी महामंडळाचा वार्र्षिक खर्च ८ हजार कोटींवर गेला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून घेतलेल्या निर्णयाची, कामांची आणि खर्चाची चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी,अशी मागणी मुकेश तिगोटे यांनी केली. यावेळी सचिन सिरसाट, गिरीश गडप्पा, निसार पठाण, दत्तात्रय कातार आदी उपस्थित होते.

किमान सहा हजारांची वाढएसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन दिले पाहिजे. १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी व शासकीय कर्मचाºयांच्या वेतनात तफावत निर्माण झाली आहे. किमान सहा हजार रुपये वाढले, तर ही तफावत दूर होईल. ही वेतनवाढ देण्यात यावी, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे मुकेश तिगोटे म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद