शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:20 IST

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्दे ८०० टँकर सुरू : जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची माहिती

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता टँकरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले असून, त्यांनी १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ दिल्याचे जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले.ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. मात्र, अजूनही अनेक मंडळांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. आजही जिल्ह्यात ५९४ गावे आणि १२४ वाड्या तहानलेल्याच आहेत. त्यामुळे जिल्हाधिकºयांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, ८०१ टँकरद्वारे या वाड्या आणि गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार केला. त्यामध्ये दिंड्यांसोबत टँकर व आरोग्य पथकांसाठी तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यांतून पंढरपूरकडे जाणाºया जवळपास ५३ दिंड्यांसोबत ५३ टँकर व आरोग्य पथके पाठविण्यात आली आहेत. त्यासाठी ११ जुलै रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पातील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यात येणार आहे. तेव्हा यंदाच्या दिंड्यासोबत पाठविण्यात आलेल्या टँकरसाठी १५ लाख रुपये व आरोग्य पथकांसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. मागील वर्षी दिंड्यांसोबत दिलेल्या टँकरचे १३ लाख रुपयांचे बिल अदा करायचे आहे. त्यासाठीही १३ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई