शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:20 IST

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्दे ८०० टँकर सुरू : जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची माहिती

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता टँकरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले असून, त्यांनी १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ दिल्याचे जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले.ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. मात्र, अजूनही अनेक मंडळांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. आजही जिल्ह्यात ५९४ गावे आणि १२४ वाड्या तहानलेल्याच आहेत. त्यामुळे जिल्हाधिकºयांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, ८०१ टँकरद्वारे या वाड्या आणि गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार केला. त्यामध्ये दिंड्यांसोबत टँकर व आरोग्य पथकांसाठी तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यांतून पंढरपूरकडे जाणाºया जवळपास ५३ दिंड्यांसोबत ५३ टँकर व आरोग्य पथके पाठविण्यात आली आहेत. त्यासाठी ११ जुलै रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पातील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यात येणार आहे. तेव्हा यंदाच्या दिंड्यासोबत पाठविण्यात आलेल्या टँकरसाठी १५ लाख रुपये व आरोग्य पथकांसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. मागील वर्षी दिंड्यांसोबत दिलेल्या टँकरचे १३ लाख रुपयांचे बिल अदा करायचे आहे. त्यासाठीही १३ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई