शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:20 IST

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्दे ८०० टँकर सुरू : जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची माहिती

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता टँकरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले असून, त्यांनी १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ दिल्याचे जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले.ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. मात्र, अजूनही अनेक मंडळांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. आजही जिल्ह्यात ५९४ गावे आणि १२४ वाड्या तहानलेल्याच आहेत. त्यामुळे जिल्हाधिकºयांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, ८०१ टँकरद्वारे या वाड्या आणि गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार केला. त्यामध्ये दिंड्यांसोबत टँकर व आरोग्य पथकांसाठी तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यांतून पंढरपूरकडे जाणाºया जवळपास ५३ दिंड्यांसोबत ५३ टँकर व आरोग्य पथके पाठविण्यात आली आहेत. त्यासाठी ११ जुलै रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पातील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यात येणार आहे. तेव्हा यंदाच्या दिंड्यासोबत पाठविण्यात आलेल्या टँकरसाठी १५ लाख रुपये व आरोग्य पथकांसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. मागील वर्षी दिंड्यांसोबत दिलेल्या टँकरचे १३ लाख रुपयांचे बिल अदा करायचे आहे. त्यासाठीही १३ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई