शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

गाढवाची धिंड काढून व्यक्त केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 19:41 IST

राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

पैठण : राज्य सरकार युक्तीवाद करण्यात कमी पडल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, असा आरोप करीत राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर गाढवाची धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले. या प्रसंगी बोलताना छावाचे तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते म्हणाले की, वर्षाच्या संघर्षानंतर मराठा समाजास  शिक्षण व नोकरी मध्ये १२ टक्के आरक्षण मिळाले. यासाठी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत शांततेत आंदोलन केली. कित्येक समाज बांधवांनी बलिदान दिले, तेव्हा कुठे राज्य शासनाने शिक्षण व नोकरीत १२ टक्के आरक्षण दिले होते. परंतू मराठा समाजाला अत्यंत कष्टाने मिळालेले आरक्षण राज्य सरकारने आरक्षणाची बाजू भक्कमपणे न मांडल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकले नाही. आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असते, तर आज आरक्षणास स्थगिती मिळाली नसती. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार निष्काळजीपणा करीत आहे, असा आरोपही यावेळी सदावर्ते यांनी केला.

राज्य सरकारने न्यायालयात कोवीडमुळे पोलिस भरती करणार नाही असे सांगितले आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरती जाहीर करत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. ( एस ई बी सी) प्रवर्गातील जागांबाबत राज्यशासन काय निर्णय घेणार आहे व यातून कसा मार्ग काढणार आहे, हे जाहीर करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत यांनी केला.

 मराठा आरक्षण स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरती स्थगित करावी, कोपर्डी आत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाpaithan-acपैठण