शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कचऱ्यात मनपाचे प्रयोग अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:21 IST

शहरात मागील ६२ दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेकडून अद्याप दिलासा देणारा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट कचºयात प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबादेत ६२ दिवसांपासून कोंडी : प्रश्न मार्गी लावणार तरी कोण? नव्या आयुक्तांची महापालिकेसह सर्वांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात मागील ६२ दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेकडून अद्याप दिलासा देणारा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट कचºयात प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. राज्य शासनाने निधी दिला, दहा तज्ज्ञ अधिकारी दिले, अजून मनपाला काय पाहिजे. एवढे सर्व करूनही शहरात कच-याचे डोंगर जशास तसे आहेत. महापालिकेला हा प्रश्न मार्गी न लावता तसाच धगधगत ठेवायचा आहे का? असाही प्रश्न निर्माण होतोे.मुळात कच-याचा प्रश्न मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. मागील दिवाळीत नारेगावकरांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतरही कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाºया मनपाला जाग आली नाही. चार महिन्यांची मुदत नारेगावकरांनी दिलेली असताना काहीच करण्यात आले नाही. निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात वेळ घालविण्यात आला. नंतर १६ फेब्रुवारीपासून नारेगावला कचरा टाकणे बंद झाले. तेव्हापासून आजपर्यंत शहर अक्षरश: कचºयात आहे. या दोन महिन्यांत महापालिकेने कचरा प्रश्नावर ७० पेक्षा अधिक बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.राज्य शासनाचा हस्तक्षेपशहरातील कचºयाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी विधानसभेत भूमिका मांडताच राज्य शासनाने तातडीने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना शहरात पाठविले. त्यांनी कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन, महसूल प्रशासनाला पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यातील एका सूत्रीवरही काम करण्यात आले नाही, हे विशेष. राज्य शासन एवढ्यावरच न थांबता विकेंद्रित पद्धतीने मशीन खरेदीसाठी मनपाला तब्बल दहा कोटींचा घसघशीत निधीही दिला. हा निधी मागील एक महिन्यापासून बँकेत पडून आहे. म्हणजे मनपा प्रशासन आणि पदाधिकाºयांना हा प्रश्न सोडविण्यात अजिबात रस नाही.दहा अधिकारी दिले तरी...राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया राज्यातील दहा अधिकाºयांची औरंगाबादेत नेमणूक केली होती. या अधिकाºयांनी आठ ते दहा दिवस शहरात तळ ठोकून मनपाच्या यंत्रणेकडून काम करून घेण्याचे प्रयत्न केले. या अधिकाºयांनी दिलेल्या सूचना एकाही वॉर्ड अधिकाºयाने ऐकल्या नाहीत. कचºयाचे वर्गीकरण करा, ओल्या कचºयावर प्रक्रिया करा, अशा अनेक सूचना त्यांनी दिल्या. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.मशीन बसविणार कोठे...महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वी ३ कोटी १६ लाख रुपये किमतीच्या ३ वेगवेगळ्या प्रकारांतील २७ मशीन खरेदी करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी कंपन्यांची दोन वेळा प्री-बीडसुद्धा घेण्यात आली. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील कंपन्यांनी निविदा भरण्यास तयारी दर्शविली आहे. २५ एप्रिलपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. एका झोनमध्ये तीनप्रमाणे २७ मशीन बसविण्यात येणार आहेत. या नेमक्या कोठे बसविणार आहेत...त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. एवढे आळशी मनपा प्रशासन आहे.आता तर आयुक्तही नाहीत...कचराकोंडीमुळे राज्य शासनाने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रभारी आयुक्त म्हणून नेमणूक केली. मागील एक महिन्यात प्रभारी आयुक्तांनीही समाधानकारक काम केले नाही. त्यांनी दिलेल्या एकाही आदेशाची प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. आता तर राम यांचीही बदली झाली. त्यामुळे महापालिका आयुक्तपद रिक्त आहे. एकीकडे शहर कचºयात असताना महापालिकेला आयुक्तही नसणे कितपत योग्य आहे.बुधवारी जागांची पाहणीकचºयावर प्रक्रिया करण्यासाठी बुधवारी मनपाच्या शिष्टमंडळाने शहरात ठिकठिकाणी पाहणी केली.अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस.डी. पानझडे, नगररचना, मालमत्ता विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी पाच ठिकाणी म्हणजेच चिकलठाणा, नारेगाव, पडेगाव, कांचनवाडी, रमानगर, हर्सूल येथे जागांची पाहणी केली. प्रभाग- एक, दोनमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा शिल्लक नाही. याबाबत विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे भालसिंग यांनी पत्रकारांना सांगितले.सुक्या कचºयाच्या गाठी करणे सुरूमनपाने मागील दोन महिन्यांत सुका कचरा जिथे जागा मिळेल तेथे साठवून ठेवला आहे. साधारणपणे ८०० ते ९०० मेट्रिक टन हा कचरा आहे. या कचºयाला प्रेस करून त्याच्या गाठी तयार करण्यात येत आहेत. शहर आणि परिसरातील जिनिंग मिलचालकांची यासाठी मदत घेण्यात येत आहे.मध्यवर्ती जकात नाक्यावर बुधवारपासून हा प्रयोग सुरू करण्यात आला. एक किलो कचºयाला प्रेस करून देण्यासाठी संबंधित ठेकेदार चार रुपये दर आकारत आहे. दराची वाटाघाटी अजून सुरू आहे.प्रेस करण्यात आलेल्या सुक्या कचºयाच्या गाठी सिमेंट कंपन्यांना पाठवून देण्यात येत आहेत. आतापर्यंत चंद्रपूर येथील सिमेंट कंपनीला तीन ते चार वेळेस कचरा देण्यात आला आहे. बुधवारी दहा टन कचरा देण्यात आला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न