शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:40 IST

मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्प : मुंबई, दिल्लीसाठी नव्या रेल्वे, प्रकल्पांना आर्थिक तरतुदीची आशा

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत आहे. आजघडीला एकेरी रेल्वे मार्गामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून परभणी-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत आहे; परंतु त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार असल्याची परिस्थिती आहे.प्रस्तावित दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग आणि रोटेगाव - कोपरगाव रेल्वे मार्गही रेंगाळला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीसगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. तसेच शिर्डी येथे जाणाºया भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे. या मार्गांसंदर्भात काहीतरी अर्थसंकल्पात असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या रेल्वे सुरूहोण्यासह रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पीटलाईन महत्त्वाची ठरते. त्यामुळे नव्या रेल्वेची मागणी करणाºया मराठवाड्यातील विशेषत: औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांवर ‘पीटलाईन’च्या नावाखाली वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याचे दिसते. त्यामुळे पीटलाईन करण्याची मागणी होत आहे.नव्या रेल्वेगाड्या मिळाव्यातमुंबई, दिल्लीसह बंगळुरूसाठी नवीन रेल्वे मिळाली पाहिजे. मनमाड-परभणी मार्गाचेही दुहेरीकरण मार्गी लागण्याची गरज आहे. औरंगाबादला पीटलाईन झाली तर किमान चार नव्या रेल्वे सुरूहोऊ शकतात. अर्थसंकल्पातून नेमके काय मिळते, हे पाहावे लागेल.- भावेश पटेल, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समितीदोन मार्ग अपेक्षितरोटेगाव-कोपरगाव आणि औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव हे रेल्वे मार्ग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किमान हे दोन्ही मार्ग मार्गी लागतील, अशी आशा आहे. औरंगाबादला पीटलाईन होणे गरजेचे आहे.- अनंत बोरकर,अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समितीमराठवाड्याच्या काही अपेक्षामनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि.मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या ८८ कि.मी. च्या नव्या मार्गाचे काम लवकर होणे.मुंबई, दिल्ली, बंगळुरूसाठी नव्या रेल्वे सुरू होणे.औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBudget 2019अर्थसंकल्प 2019