शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:40 IST

मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्प : मुंबई, दिल्लीसाठी नव्या रेल्वे, प्रकल्पांना आर्थिक तरतुदीची आशा

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत आहे. आजघडीला एकेरी रेल्वे मार्गामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून परभणी-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत आहे; परंतु त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार असल्याची परिस्थिती आहे.प्रस्तावित दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग आणि रोटेगाव - कोपरगाव रेल्वे मार्गही रेंगाळला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीसगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. तसेच शिर्डी येथे जाणाºया भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे. या मार्गांसंदर्भात काहीतरी अर्थसंकल्पात असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या रेल्वे सुरूहोण्यासह रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पीटलाईन महत्त्वाची ठरते. त्यामुळे नव्या रेल्वेची मागणी करणाºया मराठवाड्यातील विशेषत: औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांवर ‘पीटलाईन’च्या नावाखाली वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याचे दिसते. त्यामुळे पीटलाईन करण्याची मागणी होत आहे.नव्या रेल्वेगाड्या मिळाव्यातमुंबई, दिल्लीसह बंगळुरूसाठी नवीन रेल्वे मिळाली पाहिजे. मनमाड-परभणी मार्गाचेही दुहेरीकरण मार्गी लागण्याची गरज आहे. औरंगाबादला पीटलाईन झाली तर किमान चार नव्या रेल्वे सुरूहोऊ शकतात. अर्थसंकल्पातून नेमके काय मिळते, हे पाहावे लागेल.- भावेश पटेल, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समितीदोन मार्ग अपेक्षितरोटेगाव-कोपरगाव आणि औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव हे रेल्वे मार्ग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किमान हे दोन्ही मार्ग मार्गी लागतील, अशी आशा आहे. औरंगाबादला पीटलाईन होणे गरजेचे आहे.- अनंत बोरकर,अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समितीमराठवाड्याच्या काही अपेक्षामनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि.मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या ८८ कि.मी. च्या नव्या मार्गाचे काम लवकर होणे.मुंबई, दिल्ली, बंगळुरूसाठी नव्या रेल्वे सुरू होणे.औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBudget 2019अर्थसंकल्प 2019