शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मराठवाड्यातील पिकांना पावसाचा पुन्हा फटका; सात मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:52 IST

Excessive rainfall in seven circles in Marathwada परतीच्या पावसाची सर्वदूर हजेरी

ठळक मुद्देवीज पडून एक ठारजलसाठे तुडुंब

औरंगाबाद/नांदेड/परभणी/ उस्मानाबाद/लातूर/बीड : मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत परभणी व नांदेड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. अन्यत्र पावसाचा जोर कमी असला तरी पिकांचे नुकसान सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा काही भागांत अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नांदेड जिल्ह्यात एक तरुण पैनगंगेत वाहून गेल्याने मरण पावला. नांदेड जिल्ह्यातील एक व परभणी जिल्ह्यातील ६ मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील नागर जवळा (ता. मानवत) येथे सोमवारी दुपारी ३ वाजता शेतात वीज पडून गोरक्ष बालाजी रासवे (१७) हा तरुण ठार झाला. 

परभणी जिल्ह्यातील सहा मंडळांमध्ये रविवारी रात्री अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाथरी तालुक्यातील बाबळगाव मंडळात ७७ मि.मी. कासापुरी मंडळात ७४ मि.मी., जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात ७४ मि.मी., चारठाणा मंडळात ७५ मि.मी. आणि वाघी धानोरा मंडळात ६६ मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळातही ६६.८ मि.मी. पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा सर्वदूर विक्रमी पाऊस पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर दिसत असल्याने मका आणि कापसाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, सोयगाव तालुक्यातील बहुतांश गावात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे़ मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत़ कळंब तालुक्यात सर्वाधिक ३८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ तसेच तुळजापूर, परंडा, भूम तालुक्यातही चांगला पाऊस झाला़ उस्मानाबाद शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली़  नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा महसूल मंडळात सोमवारी सकाळी ८३.२५  मि.मी. ची अतिवृष्टी झाली. हदगाव, भोकर, किनवट, लोहा, उमरी तालुक्यातही सरी कोसळल्या. बीड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले.

पैनगंगेत वाहून गेल्याने शेतमजुराचा मृत्यूमांडवी (जि. नांदेड) : येथील सचिन नरेंद्र चव्हाण या शेतमजुराचा शेतातून घरी परत येताना पैनगंगा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंबाळा येथील या २३ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृतदेह विदर्भातील राजापेठ शिवारात मच्छीमारी करणाऱ्यांना सोमवारी सापडला. त्यानंतर हा मृतदेह खंबाळा येथे आणण्यात आला. किनवटचे तहसीलदार उत्तमराव कागणे यांनी खंबाळा येथे भेट देऊन पाहणी केली.

मांजरा प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठालातूर शहर व जिल्ह्यात सोमवारी दमदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरूआहे.  लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या १ जूनपासून पाण्याचा येवा सुरू आहे. सोमवारी प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, लातूरसह केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर एमआयडीसी, औसा एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे. शिरूर अनंतपाळ, औसा, निलंगा तालुक्यांत चांगला पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेती