शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा विभागात ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देनापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरण : परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.‘लोकमत’ने १४ जुलै रोजी नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचा भंडाफोड केला होता. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. ‘अभाविप’च्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी १२ वाजेदरम्यान परीक्षा भवनातील परीक्षा संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. कार्यालयात परीक्षा संचालक नसल्यामुळे एका खुर्चीवर दगड ठेवण्यात आला. तसेच परीक्षा संचालकांनी राजीनामा दिल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.आंदोलनस्थळी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलीसही दाखल झाले. तेव्हा कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात यावे, तेव्हा ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी लेखी लिहून देण्याच्या अटीवर आंदोलन मागे घेतले.यावेळी प्रदेशमंत्री अभिजित पाटील, महानगर सहमंत्री विवेक पवार, महाविद्यालय प्रमुख शिवा देखणे, गोविंद देशपांडे, आरती तांदळे, सोनू क्षीरसागर, निखिल आठवले, श्याम कातखडे, प्रभाकर माळवे, शुभम स्नेही, आशिष वडोदकर, महेंद्र मुंडे, आशिष आणेराव, ज्ञानेश्वर उद्देवाल, नितीन केदार, गोरख केंद्रे, शिवाजी वरपे आदी उपस्थित होते.साईनंतर काय सुधारणा झाली?चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रकरणात विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली. तेव्हा परीक्षा विभागात अनेक बदल केले. मात्र एका वर्षाच्या आत सर्वच बदल पूर्ववत झाल्याचे दिसून येते. यामुळे परीक्षा संचालकांसह इतर दोषींवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अभाविपचे प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांनी यावेळी केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीagitationआंदोलन