शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

परीक्षा विभागात ‘अभाविप’चे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देनापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरण : परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उघडकीस आलेल्या नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परीक्षा भवनातील संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे परीक्षा संचालकांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.‘लोकमत’ने १४ जुलै रोजी नापास विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याचा भंडाफोड केला होता. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. ‘अभाविप’च्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी १२ वाजेदरम्यान परीक्षा भवनातील परीक्षा संचालकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. कार्यालयात परीक्षा संचालक नसल्यामुळे एका खुर्चीवर दगड ठेवण्यात आला. तसेच परीक्षा संचालकांनी राजीनामा दिल्याशिवाय उठणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.आंदोलनस्थळी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलीसही दाखल झाले. तेव्हा कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात यावे, तेव्हा ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी लेखी लिहून देण्याच्या अटीवर आंदोलन मागे घेतले.यावेळी प्रदेशमंत्री अभिजित पाटील, महानगर सहमंत्री विवेक पवार, महाविद्यालय प्रमुख शिवा देखणे, गोविंद देशपांडे, आरती तांदळे, सोनू क्षीरसागर, निखिल आठवले, श्याम कातखडे, प्रभाकर माळवे, शुभम स्नेही, आशिष वडोदकर, महेंद्र मुंडे, आशिष आणेराव, ज्ञानेश्वर उद्देवाल, नितीन केदार, गोरख केंद्रे, शिवाजी वरपे आदी उपस्थित होते.साईनंतर काय सुधारणा झाली?चौका येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रकरणात विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली. तेव्हा परीक्षा विभागात अनेक बदल केले. मात्र एका वर्षाच्या आत सर्वच बदल पूर्ववत झाल्याचे दिसून येते. यामुळे परीक्षा संचालकांसह इतर दोषींवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अभाविपचे प्रदेशमंत्री अभिजित पाटील यांनी यावेळी केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीagitationआंदोलन