शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

१२ वीच्या विद्यार्थ्यांची जमिनीवर बसून परीक्षा; ‘लोकमत’च्या वृत्ताची खंडपीठाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:40 IST

रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली होती. यासंदर्भात लोकमतसह अन्य वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्ताची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट या न्यायमूर्तीद्वयींनी स्वत:हून दखल घेत त्या वृत्ताला ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून गुरुवारी (दि.२०) दाखल करून घेतले. या याचिकेवर शुक्रवारी (दि.२१) सर्वप्रथम (हाय आॅन बोर्ड) सुनावणी होणार आहे.

खंडपीठाने न्यायालयाचे मित्र (अमीकस क्युरी) म्हणून अ‍ॅड. सत्यजित एस. बोरा यांची नेमणूक केली आहे. खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. प्रतिवादी एस.एस.सी. बोर्ड आणि शिक्षण विभागाच्या अन्य प्रतिवाद्यांनी शुक्रवारी याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शपथपत्राद्वारे त्यांचे उत्तर दाखल करावे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. अ‍ॅड. बोरा यांच्या विनंतीवरून खंडपीठाने शिरूर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनासुद्धा प्रतिवादी करण्याची मुभा दिली.

नेमके काय आहे प्रकरण?रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली होती. या परीक्षा केंद्राविषयी मागील दोन महिन्यांपासून पालकांच्या तक्रारी होत्या. एस.एस.सी. बोर्डाने पालकांच्या तक्रारींसंदर्भात संबंधित परीक्षा केंद्राकडून आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला होता. विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारीच मिळाल्या नसल्याचे गटशिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या खुलाशात म्हटल्याचे वाचून ‘अतीव दु:ख आणि आश्चर्य’ वाटल्याचे खंडपीठाने उद्वेगाने म्हटले आहे. अ‍ॅड. सुरेखा महाजन यांनी एस.एस.सी. बोर्डाने संबंधित परीक्षा केंद्राला पत्राद्वारे दिलेल्या सूचनांकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. बोर्डाने पत्रात म्हटले होते की, १८ फेब्रुवारीपासून १२ वीची आणि ३ मार्चपासून १० वीची परीक्षा सुरू होत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागणार नाही याची दक्षता घ्या, तशी व्यवस्था करा, असे बोर्डाने पत्रात म्हटले होते. त्यावर केंद्रचालकांनी बोर्डाला हमी दिली होती की, त्यांच्याकडे ३५० बेंच व इतर अनुषंगिक सोयी-सुविधा आहेत. केंद्राने बोर्डाची दिशाभूलच केल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयHSC / 12th Exam12वी परीक्षा