शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

१२ वीच्या विद्यार्थ्यांची जमिनीवर बसून परीक्षा; ‘लोकमत’च्या वृत्ताची खंडपीठाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:40 IST

रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली होती. यासंदर्भात लोकमतसह अन्य वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्ताची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट या न्यायमूर्तीद्वयींनी स्वत:हून दखल घेत त्या वृत्ताला ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून गुरुवारी (दि.२०) दाखल करून घेतले. या याचिकेवर शुक्रवारी (दि.२१) सर्वप्रथम (हाय आॅन बोर्ड) सुनावणी होणार आहे.

खंडपीठाने न्यायालयाचे मित्र (अमीकस क्युरी) म्हणून अ‍ॅड. सत्यजित एस. बोरा यांची नेमणूक केली आहे. खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. प्रतिवादी एस.एस.सी. बोर्ड आणि शिक्षण विभागाच्या अन्य प्रतिवाद्यांनी शुक्रवारी याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शपथपत्राद्वारे त्यांचे उत्तर दाखल करावे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. अ‍ॅड. बोरा यांच्या विनंतीवरून खंडपीठाने शिरूर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनासुद्धा प्रतिवादी करण्याची मुभा दिली.

नेमके काय आहे प्रकरण?रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली होती. या परीक्षा केंद्राविषयी मागील दोन महिन्यांपासून पालकांच्या तक्रारी होत्या. एस.एस.सी. बोर्डाने पालकांच्या तक्रारींसंदर्भात संबंधित परीक्षा केंद्राकडून आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला होता. विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारीच मिळाल्या नसल्याचे गटशिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या खुलाशात म्हटल्याचे वाचून ‘अतीव दु:ख आणि आश्चर्य’ वाटल्याचे खंडपीठाने उद्वेगाने म्हटले आहे. अ‍ॅड. सुरेखा महाजन यांनी एस.एस.सी. बोर्डाने संबंधित परीक्षा केंद्राला पत्राद्वारे दिलेल्या सूचनांकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. बोर्डाने पत्रात म्हटले होते की, १८ फेब्रुवारीपासून १२ वीची आणि ३ मार्चपासून १० वीची परीक्षा सुरू होत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागणार नाही याची दक्षता घ्या, तशी व्यवस्था करा, असे बोर्डाने पत्रात म्हटले होते. त्यावर केंद्रचालकांनी बोर्डाला हमी दिली होती की, त्यांच्याकडे ३५० बेंच व इतर अनुषंगिक सोयी-सुविधा आहेत. केंद्राने बोर्डाची दिशाभूलच केल्याचे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयHSC / 12th Exam12वी परीक्षा