शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

अपघातांचे दुष्टचक्र थांबेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:11 IST

शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.मागील काही दिवसांत नांदेड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अपघातांची मालीकाच सुरु आहे. २३ आॅगस्ट रोजी शहरातील जुना मोंढा नाक्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तर २४ आॅगस्ट रोजी देगलूरहून नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स उलटून चौघांना प्राण गमवावे लागले. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यात देगलूरमधील मायलेकीचाही मृत्यू झाला. २५ आॅगस्ट रोजी पैनगंगानदीवर ट्रकच्या धडकेने कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात आ. अनिल गोटे यांच्या बंधूसह त्यांच्या भावजयीला प्राणास मुकावे लागले. भरधाव ट्रकचालक या अपघातास कारणीभूत ठरला. त्यानंतर २९ आॅगस्टही अपघातवार होता. नांदेड-लातूर रस्त्यावर मुसलमानवाडीजवळ जीप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही मालीका ३० आॅगस्ट रोजीही सुरुच राहिली. मुखेड शहरानजीक महाजन पेट्रोलपंपाजवळ कार-मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात चुलत्या-पुतण्यासह तिघांचा बळी गेला. शेतकरी असलेले हे चुलते-पुतणे बी-बियाणे आणण्यासाठी निघाले होते. एकूणच मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.२०१४ मध्ये जिल्ह्यात ७०९ अपघातांच्या घटना घडल्या. यात २७४ जणांचा मृत्यू झाला असून ४४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १५३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. २०१५ मध्येही अपघातांचे सत्र सुरुच राहिले.या वर्षात विविध अपघातांत २५८ नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर ४१८ नागरिक या अपघातांमुळे जायबंदी झाले. या वर्षात किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ६९ एवढी होती. तर २०१६ मध्ये २८१ जण मृत्यूस मुकले. जिल्ह्यात ७८७ अपघात होऊन त्यात ४४८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींची संख्याही १७५ पेक्षा अधिक असल्याचे प्रशासनाकडील आकडेवारी सांगते.