शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अपघातांचे दुष्टचक्र थांबेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:11 IST

शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.मागील काही दिवसांत नांदेड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अपघातांची मालीकाच सुरु आहे. २३ आॅगस्ट रोजी शहरातील जुना मोंढा नाक्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तर २४ आॅगस्ट रोजी देगलूरहून नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स उलटून चौघांना प्राण गमवावे लागले. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यात देगलूरमधील मायलेकीचाही मृत्यू झाला. २५ आॅगस्ट रोजी पैनगंगानदीवर ट्रकच्या धडकेने कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात आ. अनिल गोटे यांच्या बंधूसह त्यांच्या भावजयीला प्राणास मुकावे लागले. भरधाव ट्रकचालक या अपघातास कारणीभूत ठरला. त्यानंतर २९ आॅगस्टही अपघातवार होता. नांदेड-लातूर रस्त्यावर मुसलमानवाडीजवळ जीप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही मालीका ३० आॅगस्ट रोजीही सुरुच राहिली. मुखेड शहरानजीक महाजन पेट्रोलपंपाजवळ कार-मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात चुलत्या-पुतण्यासह तिघांचा बळी गेला. शेतकरी असलेले हे चुलते-पुतणे बी-बियाणे आणण्यासाठी निघाले होते. एकूणच मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.२०१४ मध्ये जिल्ह्यात ७०९ अपघातांच्या घटना घडल्या. यात २७४ जणांचा मृत्यू झाला असून ४४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १५३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. २०१५ मध्येही अपघातांचे सत्र सुरुच राहिले.या वर्षात विविध अपघातांत २५८ नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर ४१८ नागरिक या अपघातांमुळे जायबंदी झाले. या वर्षात किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ६९ एवढी होती. तर २०१६ मध्ये २८१ जण मृत्यूस मुकले. जिल्ह्यात ७८७ अपघात होऊन त्यात ४४८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींची संख्याही १७५ पेक्षा अधिक असल्याचे प्रशासनाकडील आकडेवारी सांगते.