शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

अपघातांचे दुष्टचक्र थांबेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:11 IST

शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.मागील काही दिवसांत नांदेड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अपघातांची मालीकाच सुरु आहे. २३ आॅगस्ट रोजी शहरातील जुना मोंढा नाक्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तर २४ आॅगस्ट रोजी देगलूरहून नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स उलटून चौघांना प्राण गमवावे लागले. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यात देगलूरमधील मायलेकीचाही मृत्यू झाला. २५ आॅगस्ट रोजी पैनगंगानदीवर ट्रकच्या धडकेने कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात आ. अनिल गोटे यांच्या बंधूसह त्यांच्या भावजयीला प्राणास मुकावे लागले. भरधाव ट्रकचालक या अपघातास कारणीभूत ठरला. त्यानंतर २९ आॅगस्टही अपघातवार होता. नांदेड-लातूर रस्त्यावर मुसलमानवाडीजवळ जीप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही मालीका ३० आॅगस्ट रोजीही सुरुच राहिली. मुखेड शहरानजीक महाजन पेट्रोलपंपाजवळ कार-मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात चुलत्या-पुतण्यासह तिघांचा बळी गेला. शेतकरी असलेले हे चुलते-पुतणे बी-बियाणे आणण्यासाठी निघाले होते. एकूणच मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.२०१४ मध्ये जिल्ह्यात ७०९ अपघातांच्या घटना घडल्या. यात २७४ जणांचा मृत्यू झाला असून ४४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १५३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. २०१५ मध्येही अपघातांचे सत्र सुरुच राहिले.या वर्षात विविध अपघातांत २५८ नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर ४१८ नागरिक या अपघातांमुळे जायबंदी झाले. या वर्षात किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ६९ एवढी होती. तर २०१६ मध्ये २८१ जण मृत्यूस मुकले. जिल्ह्यात ७८७ अपघात होऊन त्यात ४४८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींची संख्याही १७५ पेक्षा अधिक असल्याचे प्रशासनाकडील आकडेवारी सांगते.