शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कन्नडकरांचे दरवर्षी दोन कोटी रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:58 IST

पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते.

सुरेश चव्हाणकन्नड : पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी कन्नडकर दरवर्षी तब्बल दोन कोटी रुपये मोजतात. या गोष्टीवर कुणी विश्वास ठेविल की नाही, हा वादाचा विषय होऊ शकतो, मात्र या गोष्टीची सत्यताही पटते.शहराला अंबाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी जेमतेम पावसाळा झाल्याने प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा झाला होता. शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या जवळपास आहे. यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी नगर परिषदेने चौथ्या दिवशी पाणी देण्याचे नियोजन केले आहे. तरीही सध्या प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली पोहोचला आहे.नगर परिषदेकडून पुरवठा करण्यात येत असलेले नळाचे पाणी शहरातील जवळपास सर्वच नागरीक फक्त सांडपाणी म्हणून वापरतात तर पिण्यासाठी आरओचे पाणी वापरतात. अर्थात शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेत नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले. मात्र, २६ आरओ सेंटर्सला जोडणी दिल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय दुसाणे यांनी सांगितले. शहरात ८ हजार कुटुंब असल्याची माहिती नगर परिषदेतून मिळाली.प्रत्येक कुटुंबाला दररोज एक जार गृहीत धरल्यास ८ हजार जार शहरात लागतात. शिवाय हॉटेल व्यावसायिक आणि सरकारी कार्यालये वेगळेच. घरपोच जार हवा असल्यास एका जारला २० रुपये तर सेंटरवरुन नेल्यास १० रुपये मोजावे लागतात. दररोज सरासरी पाच हजार जार धरले आणि प्रत्येक जारला सरासरी १५ रुपये धरल्यास एका दिवसासाठी सुमारे पन्नास ते सत्तर हजार रुपये कन्नडकर खर्च करतात. याचा अर्थ महिन्याला १५ ते १७ लाख गृहीत धरले तर ढोबळमानाने बारा महिन्यांसाठी सरासरी दोन कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावे लागतात, असेच म्हणावे लागेल.विनापरवाना आरओ सेंटरशहरात आरओ सेंटरसाठी नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते, मात्र शहरातील एकाही आरओ सेंटरसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेकडे नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater pollutionजल प्रदूषण