शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कन्नडकरांचे दरवर्षी दोन कोटी रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:58 IST

पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते.

सुरेश चव्हाणकन्नड : पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी कन्नडकर दरवर्षी तब्बल दोन कोटी रुपये मोजतात. या गोष्टीवर कुणी विश्वास ठेविल की नाही, हा वादाचा विषय होऊ शकतो, मात्र या गोष्टीची सत्यताही पटते.शहराला अंबाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी जेमतेम पावसाळा झाल्याने प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा झाला होता. शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या जवळपास आहे. यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी नगर परिषदेने चौथ्या दिवशी पाणी देण्याचे नियोजन केले आहे. तरीही सध्या प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली पोहोचला आहे.नगर परिषदेकडून पुरवठा करण्यात येत असलेले नळाचे पाणी शहरातील जवळपास सर्वच नागरीक फक्त सांडपाणी म्हणून वापरतात तर पिण्यासाठी आरओचे पाणी वापरतात. अर्थात शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेत नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले. मात्र, २६ आरओ सेंटर्सला जोडणी दिल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय दुसाणे यांनी सांगितले. शहरात ८ हजार कुटुंब असल्याची माहिती नगर परिषदेतून मिळाली.प्रत्येक कुटुंबाला दररोज एक जार गृहीत धरल्यास ८ हजार जार शहरात लागतात. शिवाय हॉटेल व्यावसायिक आणि सरकारी कार्यालये वेगळेच. घरपोच जार हवा असल्यास एका जारला २० रुपये तर सेंटरवरुन नेल्यास १० रुपये मोजावे लागतात. दररोज सरासरी पाच हजार जार धरले आणि प्रत्येक जारला सरासरी १५ रुपये धरल्यास एका दिवसासाठी सुमारे पन्नास ते सत्तर हजार रुपये कन्नडकर खर्च करतात. याचा अर्थ महिन्याला १५ ते १७ लाख गृहीत धरले तर ढोबळमानाने बारा महिन्यांसाठी सरासरी दोन कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावे लागतात, असेच म्हणावे लागेल.विनापरवाना आरओ सेंटरशहरात आरओ सेंटरसाठी नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते, मात्र शहरातील एकाही आरओ सेंटरसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेकडे नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater pollutionजल प्रदूषण