शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

कन्नडकरांचे दरवर्षी दोन कोटी रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:58 IST

पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते.

सुरेश चव्हाणकन्नड : पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी कन्नडकर दरवर्षी तब्बल दोन कोटी रुपये मोजतात. या गोष्टीवर कुणी विश्वास ठेविल की नाही, हा वादाचा विषय होऊ शकतो, मात्र या गोष्टीची सत्यताही पटते.शहराला अंबाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी जेमतेम पावसाळा झाल्याने प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा झाला होता. शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या जवळपास आहे. यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी नगर परिषदेने चौथ्या दिवशी पाणी देण्याचे नियोजन केले आहे. तरीही सध्या प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली पोहोचला आहे.नगर परिषदेकडून पुरवठा करण्यात येत असलेले नळाचे पाणी शहरातील जवळपास सर्वच नागरीक फक्त सांडपाणी म्हणून वापरतात तर पिण्यासाठी आरओचे पाणी वापरतात. अर्थात शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेत नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले. मात्र, २६ आरओ सेंटर्सला जोडणी दिल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय दुसाणे यांनी सांगितले. शहरात ८ हजार कुटुंब असल्याची माहिती नगर परिषदेतून मिळाली.प्रत्येक कुटुंबाला दररोज एक जार गृहीत धरल्यास ८ हजार जार शहरात लागतात. शिवाय हॉटेल व्यावसायिक आणि सरकारी कार्यालये वेगळेच. घरपोच जार हवा असल्यास एका जारला २० रुपये तर सेंटरवरुन नेल्यास १० रुपये मोजावे लागतात. दररोज सरासरी पाच हजार जार धरले आणि प्रत्येक जारला सरासरी १५ रुपये धरल्यास एका दिवसासाठी सुमारे पन्नास ते सत्तर हजार रुपये कन्नडकर खर्च करतात. याचा अर्थ महिन्याला १५ ते १७ लाख गृहीत धरले तर ढोबळमानाने बारा महिन्यांसाठी सरासरी दोन कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावे लागतात, असेच म्हणावे लागेल.विनापरवाना आरओ सेंटरशहरात आरओ सेंटरसाठी नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते, मात्र शहरातील एकाही आरओ सेंटरसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेकडे नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater pollutionजल प्रदूषण