शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

कन्नडकरांचे दरवर्षी दोन कोटी रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:58 IST

पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते.

सुरेश चव्हाणकन्नड : पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे. त्यामुळेच पाण्याला जीवन संबोधण्यात येते. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी कन्नडकर दरवर्षी तब्बल दोन कोटी रुपये मोजतात. या गोष्टीवर कुणी विश्वास ठेविल की नाही, हा वादाचा विषय होऊ शकतो, मात्र या गोष्टीची सत्यताही पटते.शहराला अंबाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी जेमतेम पावसाळा झाल्याने प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा झाला होता. शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या जवळपास आहे. यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता शहराला पाणीटंचाई भासू नये, यासाठी नगर परिषदेने चौथ्या दिवशी पाणी देण्याचे नियोजन केले आहे. तरीही सध्या प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली पोहोचला आहे.नगर परिषदेकडून पुरवठा करण्यात येत असलेले नळाचे पाणी शहरातील जवळपास सर्वच नागरीक फक्त सांडपाणी म्हणून वापरतात तर पिण्यासाठी आरओचे पाणी वापरतात. अर्थात शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेत नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले. मात्र, २६ आरओ सेंटर्सला जोडणी दिल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय दुसाणे यांनी सांगितले. शहरात ८ हजार कुटुंब असल्याची माहिती नगर परिषदेतून मिळाली.प्रत्येक कुटुंबाला दररोज एक जार गृहीत धरल्यास ८ हजार जार शहरात लागतात. शिवाय हॉटेल व्यावसायिक आणि सरकारी कार्यालये वेगळेच. घरपोच जार हवा असल्यास एका जारला २० रुपये तर सेंटरवरुन नेल्यास १० रुपये मोजावे लागतात. दररोज सरासरी पाच हजार जार धरले आणि प्रत्येक जारला सरासरी १५ रुपये धरल्यास एका दिवसासाठी सुमारे पन्नास ते सत्तर हजार रुपये कन्नडकर खर्च करतात. याचा अर्थ महिन्याला १५ ते १७ लाख गृहीत धरले तर ढोबळमानाने बारा महिन्यांसाठी सरासरी दोन कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करावे लागतात, असेच म्हणावे लागेल.विनापरवाना आरओ सेंटरशहरात आरओ सेंटरसाठी नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते, मात्र शहरातील एकाही आरओ सेंटरसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात किती आरओ सेंटर आहेत, याची नगर परिषदेकडे नोंद नाही, असे मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातwater pollutionजल प्रदूषण