शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अखेर रस्त्यांची होणार डागडुजी; पावसाळ्यानंतर मनपा निधीतून ३९ रस्त्यांचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:20 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ठळक मुद्देदहा दिवसांत निविदा काढणारडांबरीकरणावर ५७ कोटींंचा खर्च येणार

औरंगाबाद : शहरातील अनेक प्रमुख रस्ते खराब झाले आहेत. मागील काही वर्षांपासून खराब रस्त्यांची डागडुजीही करायला महापालिका तयार नाही. आता ३९ रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावर ५७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, आठ ते दहा दिवसांत त्यासंबंधीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

खड्ड्यांचे शहर, अशी प्रतिमा अलीकडे काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. राज्य शासनाने तीन टप्प्यांत महापालिकेला निधी दिला. पहिल्या टप्प्यात २४ कोटी, नंतर १०० कोटी, गतवर्षी १५२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शासनाच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे व्यापक प्रमाणात करण्यात आली; परंतु अनेक अत्यावश्यक रस्त्यांची कामे राहून गेली होती. या रस्त्यांची कामे महापालिका निधीतून करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५७ कोटींची कामे केली जाणार आहेत. या कामांबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, ५७ कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्याची फाइल मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. फाइल मंजूर झाल्यावर येत्या आठ-दहा दिवसांत निविदा काढण्यात येईल. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यावर रस्त्यांची कामे सुरू केली जातील. सध्या पावसाळा असल्याने कामे सुरू करणे शक्य नाही. पावसाळा संपल्यावरच ही कामे सुरू होतील. सध्या ३९ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून महापालिकेने सिमेंट रस्त्यांची कामे पूर्णपणे बंद केली आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद