शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

बीड बायपासची अपघाती मार्गाची ओळख पुसणार; अखेर रुंदीकरणाचे काम झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:07 IST

आंदोलने, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दिला निधी

ठळक मुद्देचार उड्डाणपुलांसह १७ कि.मी. रस्त्याचे काम यातून होणार

- विकास राऊत 

औरंगाबाद : बीड बायपासच्या कामाला तीन महिन्यांनंतर मुहूर्त लागला असून, आठवडाभरापासून कामाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावाकडे धाव घेतल्यामुळे २९१ कोटींच्या बायपासच्या कामाला ग्रहण लागले होते; परंतु मजूर पुन्हा आल्यामुळे कामाने वेग घेतला आहे. 

अपघाती मार्ग म्हणून ओळख असलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मागील काही वर्षांपासून सातारा-देवळाईकरांनी वारंवार आंदोलने केली, तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यासाठी निधी दिला आहे. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीकडे या कामाचे कंत्राट देण्यात आले असून, याच कंत्राटदार कंपनीने शहरातील रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौकसह अनेक रस्ते बांधलेले आहेत. ९२ कोटी रुपयांची इतर कामांसाठी तरतूद केली असून, ३८३ कोटींपैकी २९१ कोटींत हा पूर्ण प्रकल्प होणार आहे. ईपीसी हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेलवर या रस्त्याचे काम करण्यात येणार असून, चार उड्डाणपुलांसह १७ कि.मी. रस्त्याचे काम यातून होणार आहे.  

आठवडाभरापासून  दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. पुलांचे कामही सुरू झाले आहे. भूसंपादनासाठी मनपा आणि बांधकाम विभागाने परिश्रम घेतले आहेत. शहरासाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून रस्त्याच्या कामाला निधी मिळाला आहे. २ वर्षांचा कालावधी असून, दीड वर्षात काम करण्याचा दावा कंत्राटदार जीएनआयने केला आहे. हायब्रीड अ‍ॅन्युटीमुळे ७० कोटींनी कमी निविदा देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा मोठा फायदा झाला आहे, असा दावा बांधकाम विभाग सूत्रांनी केला. 

चार उड्डाणपुलांच्या डिझाईनला मंजुरी एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौक आणि केम्ब्रिज शाळेसमोर, असे चार उड्डाणपूल या प्रकल्पात समाविष्ट आहेत. याचे डिझाईन बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. पुलांचे काम सुरू झाले आहे. स्वतंत्र अभियंता नियुक्तीसाठी जो खर्च होईल त्याची ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला द्यावी लागणार आहे. एनएचएआयच्या धर्तीवर ही तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी