शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बीड बायपासची अपघाती मार्गाची ओळख पुसणार; अखेर रुंदीकरणाचे काम झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:07 IST

आंदोलने, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दिला निधी

ठळक मुद्देचार उड्डाणपुलांसह १७ कि.मी. रस्त्याचे काम यातून होणार

- विकास राऊत 

औरंगाबाद : बीड बायपासच्या कामाला तीन महिन्यांनंतर मुहूर्त लागला असून, आठवडाभरापासून कामाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावाकडे धाव घेतल्यामुळे २९१ कोटींच्या बायपासच्या कामाला ग्रहण लागले होते; परंतु मजूर पुन्हा आल्यामुळे कामाने वेग घेतला आहे. 

अपघाती मार्ग म्हणून ओळख असलेल्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मागील काही वर्षांपासून सातारा-देवळाईकरांनी वारंवार आंदोलने केली, तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्यासाठी निधी दिला आहे. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीकडे या कामाचे कंत्राट देण्यात आले असून, याच कंत्राटदार कंपनीने शहरातील रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौकसह अनेक रस्ते बांधलेले आहेत. ९२ कोटी रुपयांची इतर कामांसाठी तरतूद केली असून, ३८३ कोटींपैकी २९१ कोटींत हा पूर्ण प्रकल्प होणार आहे. ईपीसी हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेलवर या रस्त्याचे काम करण्यात येणार असून, चार उड्डाणपुलांसह १७ कि.मी. रस्त्याचे काम यातून होणार आहे.  

आठवडाभरापासून  दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. पुलांचे कामही सुरू झाले आहे. भूसंपादनासाठी मनपा आणि बांधकाम विभागाने परिश्रम घेतले आहेत. शहरासाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून रस्त्याच्या कामाला निधी मिळाला आहे. २ वर्षांचा कालावधी असून, दीड वर्षात काम करण्याचा दावा कंत्राटदार जीएनआयने केला आहे. हायब्रीड अ‍ॅन्युटीमुळे ७० कोटींनी कमी निविदा देण्यात आली आहे. यामध्ये शासनाचा मोठा फायदा झाला आहे, असा दावा बांधकाम विभाग सूत्रांनी केला. 

चार उड्डाणपुलांच्या डिझाईनला मंजुरी एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौक आणि केम्ब्रिज शाळेसमोर, असे चार उड्डाणपूल या प्रकल्पात समाविष्ट आहेत. याचे डिझाईन बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. पुलांचे काम सुरू झाले आहे. स्वतंत्र अभियंता नियुक्तीसाठी जो खर्च होईल त्याची ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला द्यावी लागणार आहे. एनएचएआयच्या धर्तीवर ही तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाfundsनिधी