शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

अखेर रस्त्यांचे भाग्य उजळणार

By admin | Updated: September 11, 2016 01:23 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ६ हजार ८८० किलोमीटर लांबीचे जिल्हा परिषदेच्या मालकीचे ग्रामीण रस्ते आहेत. यापैकी आजही तब्बल ४ हजार २८० किलोमीटर रस्त्याला डांबराचा साधा स्पर्शही झालेला नाही.

औरंगाबाद : जिल्ह्यात ६ हजार ८८० किलोमीटर लांबीचे जिल्हा परिषदेच्या मालकीचे ग्रामीण रस्ते आहेत. यापैकी आजही तब्बल ४ हजार २८० किलोमीटर रस्त्याला डांबराचा साधा स्पर्शही झालेला नाही. दरम्यान, या रस्त्यांसंदर्भात शासनाने नुकताच निर्णय जाहीर केला असून, यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या डांबरीकरणाचे काम करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला असणार आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार येत्या ८-१० दिवसांत जिल्हा परिषदेच्या सर्व ६० गटांतील प्रत्येकी १ किंवा २ किलोमीटर सलग लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरणासंबंधीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी दिली. बेदमुथा यांनी सांगितले की, आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ६०० किलोमीटर लांब रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे.१ किलोमीटर लांब रस्त्याच्या डांबरीकरणासाठी किमान २५ ते ५० लाखांपर्यंतचा खर्च लागतो. त्यामुळे सातत्याने निधीअभावी ग्रामीण रस्त्यांचे डांबरीकरण होऊ शकले नाही. ग्रामीण रस्ता दुरुस्तीसाठी शासनाकडून विशेष रस्ते-पूल दुरुस्ती (एसआर) या शीर्षकाखाली निधीची तरतूद केली जाते. त्यातून केवळ दुरुस्तीचीच कामे हाती घेतली जातात. मात्र, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीडीसी) तगादा लावला. त्यामुळे वर्षाला किमान ५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करता आले. नवीन निर्णयानुसार डांबरीकरणाचे काम दुप्पट अर्थात वर्षाला किमान १०० किलोमीटर लांब एवढे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व उपअभियंत्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गटांमधल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून प्रतिगट १ ते २ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.