शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुपारच्या आनंदावर संध्याकाळी विरजण; लॉकडाऊन ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 12:58 IST

प्रशासकीय वर्तुळात कनिष्ठांपासून वरिष्ठ ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

ठळक मुद्दे अनलॉक करण्याच्या घोषणेच्या टर्न आणि यु-टर्नने संभ्रमजिल्ह्यात सर्व मिळून ३ हजार ४५८ पैकी अंदाजे २ हजार ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पॉझिटिव्हिटी रेट कमी होत ३१ मे रोजी २.८३ वर आला. सध्या २.२६ टक्के आहे.

औरंगाबाद : राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर कमी असल्यामुळे सर्व काही अनलॉक करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर करताच दुपारनंतर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सगळ्या बाजारपेठेत आनंदाला उधाण आले. त्यांच्या घोषणेचा टर्न संध्याकाळी यु-टर्नच्या रुपात बदलल्यानंतर व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह जनसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले.

सर्वसामान्यांपासून सर्व व्यावसायिकांना सरकारी विसंवादाने बुचकळ्यात पाडल्यामुळे नेमका हा काय प्रकार यासाठी एकमेकांना फोन करून व्यापाऱ्यांनी सत्य काय आहे हे विचारले. प्रशासकीय वर्तुळात कनिष्ठांपासून वरिष्ठ ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. प्रत्येकाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे बोट दाखवून हात वर केले.

दुपारी अनलॉकची बातमी येताच सर्व क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले होते. हॉटेल चालकांनी तातडीने साफसफाई करण्यास सुरूवात केली. तर शहरातील सर्व मॉलच्या आवारात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शासन निर्णयाबाबत उत्सुकतेने विचारणा केली. जिल्ह्यात सध्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यापारास मुभा दिलेली आहे. बहुतांश जणांनी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला संपर्क करून जिल्ह्यात सर्व काही उघडणार आहे काय, याची माहिती घेतली. मात्र सायंकाळी अनेकांची निराशाच झाली.

३४५८ पैकी २ हजार ऑक्सिजन खाटाजिल्ह्यात सर्व मिळून ३ हजार ४५८ पैकी अंदाजे २ हजार ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर प्रशासनाने ऑक्सिजन खाटांची उपलब्धता किती आहे, याची माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घटएप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.४४ टक्के एवढा होता. तो मागील महिनाभरात कमी कमी होत ३१ मे रोजी २.८३ वर आला. सध्या २.२६ टक्के आहे.

लॉकडाऊन जैसे थे राहील- जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेची माहिती संकलित केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर विचारणा केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. औरंगाबादमध्ये लॉकडाऊन ‘जैसे थे’ राहील, याबाबत सीएमओ कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर काही माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कभी खुशी कभी गमजिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले, अनलॉकचा निर्णय येताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पुन्हा निर्णय बदलण्याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे ‘कभी खुशी तर कभी गम’ असा अनुभव आम्ही घेतला. सर्व अनलॉक झाले असते तर आनंदच झाला असता.

या निर्णयामुळे काळजी वाढली होतीएकदम अनलॉक म्हटले असते तर नागरिकांचा भडका उडाला असता. शिवाय हॉटेलमध्ये स्टाफ देखील नाही, पूर्ण सेवा देण्यासाठी. अनलॉकची पूर्वकल्पना दिली तर तयारी करता येईल, असे औरंगाबाद जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद