शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग

By नंदकिशोर पाटील | Updated: April 25, 2024 11:49 IST

महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यात आले, यावरून बरेच वादंग माजले आहे. महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे, तर बाळासाहेब ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही. आमच्यासाठी ते आजही वंदनीय आहेत, असे स्पष्टीकरण शिंदेसेनेकडून देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती आणि बुलडाणा अशा आठ मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रामुख्याने पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील या आठ जागांवर नजर टाकली, तर भाजप आणि शिवसेनेचे बलाबल समसमान आहे. अमरावती, अकोला, वर्धा आणि नांदेड येथे भाजपचे खासदार आहेत, तर बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली आणि परभणीत शिवसेनेचे. थोडक्यात काय, तर हा सगळा टापू बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाचा टक्का खूपच घसरला, शिवाय तिथे महायुतीला फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. म्हणूनच महायुतीने या मतदारसंघातील जाहिरातीत बाळासाहेबांचे छायाचित्र वापरले असावे, असा तर्क काढता येतो. शिवसेना दोन गटांत विभागली गेली असली, तरी स्व.बाळासाहेबांचे स्थान दोन्हीकडे अढळ आहे. म्हणूनच, शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते, एक वेळ पक्ष, चिन्ह नेले हे समजू शकतो, पण त्यांनी तर माझा बापही पळविला!

गुलमंडी ते दिल्ली!बाळासाहेब ठाकरे यांचे मराठवाड्याशी खूप जुने नाते आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी गुलमंडीत शिवसेनेची शाखा सुरू झाली आणि मुंबई-ठाण्यात ऐकू येणारी ‘जय भवानी-जय शिवाजी’ ही घोषणा औरंगाबादेत घुमू लागली. एरवी मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेने १९८४ च्या भिवंडी दंगलीनंतर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्याचा फायदा झाला. औरंगाबाद ही तर या भूमिकेसाठी अगदी सुपीक भूमी होती. बाळासाहेबांच्या जहाल हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भारावलेल्या तरुणांची फौज गावोगावी शिवसेनेची शाखा स्थापन करू लागली. १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. ‘खान हवा की बाण’ अशी आक्रमक भूमिका घेत, महापालिका निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेला मिळालेले हे यश होते. मुंबई-ठाण्यानंतर शिवसेनेला मिळालेला हा पहिला मोठा विजय होता. याच पाठबळावर १९८९ साली मोरेश्वर सावे खासदार म्हणून निवडून आले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, ही बाळासाहेबांची मागणीही प्रचंड गाजली.

नामांतर आणि बाळासाहेबमराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. ६ डिसेंबर, १९९४ रोजी नांदेडच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी, ‘ज्यांच्या घरी नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ?’ असा बोचरा सवाल केल्याने संघर्षाची ठिणगी पडली. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. शरद पवारांनी विद्यापीठ नामांतराची घोषणा केली आणि बाळासाहेबांनी आपल्या टीकेची धार आणखीच तीव्र केली. शिवसेनेला याचा राजकीय फायदा झाला. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेचे दहा आमदार निवडून आले. नामांतर आंदोलनानंतर मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झपाट्याने झाला. विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर, ठाकरे यांची भूमिका मवाळ झाली. ते म्हणाले, ‘ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावास माझा विरोध नव्हता, तर मराठवाड्याचा लढाऊ इतिहास पुसला जाऊ नये, एवढेच आमचे म्हणणे होते!’

परभणीची सभा आणि...२१ फेब्रुवारी, १९९४ रोजी परभणीत झालेली बाळासाहेब ठाकरे यांची सभा खूप गाजली. तत्पूर्वी, औरंगाबाद दंगलीनंतर निषेध सभा घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे यांना पोलिसांनी पुण्याजवळ अडविले होते. बाळासाहेबांनी तो प्रसंग परभणीच्या सभेत सांगितला. ते म्हणाले, मला अटक झाली असती, तर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असते, म्हणून मी माघारी फिरलो. बाळासाहेबांच्या त्या सभेने परभणी, हिंगोली आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्याचा राजकीय पट बदलला. १९९८ चा अपवाद वगळता गेल्या ३३ वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे, तर १९९१ साली विलासराव गुंडेवार यांनी हिंगोलीत शिवसेनेचे खाते उघडले आणि त्यानंतर हिंगोलीत पाच वेळा शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

चौकार मारणार का?उद्धवसेना मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद अशा चार जागा लढवित आहे. संजय उर्फ बंडू जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) हे दोन खासदार उद्धवसेनेत, तर हेमंत पाटील (हिंगोली) हे शिंदेसेनेत आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे. उद्धवसेनेचे चारही उमेदवार तुल्यबळ आहेत. महायुतीच्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरे यावेळीही चौकार मारणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादparbhani-pcपरभणीosmanabad-pcउस्मानाबादhingoli-pcहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४