शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

By मुजीब देवणीकर | Updated: June 24, 2023 13:56 IST

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शहराची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात अजून ३० टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत सुरू करणारा ४५० अश्वशक्तीचा सहावा पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पंप सुरू झाल्यास शहराला पाच एमएलडीपर्यंत जास्त पाणी मिळेल. जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात १६ फूट पाणी शिल्लक आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावत असते. सध्या १३० एमएलडी पाणी दररोज शहरात येत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यातच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. यंदा पाऊसच लांबल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यात पाणी येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. जायकवाडी धरणातील बंद असलेला सहावा पंप लवकरच सुरू केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले. धरणात सध्या ३० टक्क्यांपर्यंत पाणी असून, जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात १६ फूट पाणीपातळी आहे. तलावातून दररोज आठ एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. हे पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

जामा मशीद येथे विशेष दुआजून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीला सुरुवात करू शकतात. यंदा पावसाळा लांबल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे पावसासाठी विशेष दुआ करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका