शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसाळा लांबला तरी ‘नो टेन्शन’; जायकवाडी धरणात ३० टक्के, हर्सूल तलावात १६ फूट पाणी!

By मुजीब देवणीकर | Updated: June 24, 2023 13:56 IST

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शहराची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात अजून ३० टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत सुरू करणारा ४५० अश्वशक्तीचा सहावा पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पंप सुरू झाल्यास शहराला पाच एमएलडीपर्यंत जास्त पाणी मिळेल. जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात १६ फूट पाणी शिल्लक आहे.

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जायकवाडी धरणातील पाणीपातळी खालावत असते. सध्या १३० एमएलडी पाणी दररोज शहरात येत आहे. मागील वर्षी जुलै महिन्यातच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. यंदा पाऊसच लांबल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. धरणात ऑगस्ट महिन्यात पाणी येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. जायकवाडी धरणातील बंद असलेला सहावा पंप लवकरच सुरू केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले. धरणात सध्या ३० टक्क्यांपर्यंत पाणी असून, जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात १६ फूट पाणीपातळी आहे. तलावातून दररोज आठ एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. हे पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

जामा मशीद येथे विशेष दुआजून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यास शेतकरी पेरणीला सुरुवात करू शकतात. यंदा पावसाळा लांबल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे पावसासाठी विशेष दुआ करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका