शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

टक्केवारी वाढली तरी समाधान नाही; १०० पैकी १०० गुण मिळूनही केली गुणपडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:55 IST

विशिष्ट नियमामुळे उत्तरपत्रिका पुनर्तपासणीत अनेकांचे गुण झाले कमी 

ठळक मुद्देविभागीय मंडळाकडे अनेक विद्यार्थ्यांनी केले अर्ज खेळाचे गुण पाठविण्यात शाळांची दिरंगाई

- राम शिनगारे  औरंगाबाद : १०० पैकी १०० गुण मिळाल्यानंतरही दहावीच्या ५९४ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांसाठी अर्ज करून झेरॉक्स प्रती मागविल्या. मात्र, हे करताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विशिष्ट नियमामुळे काही विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन गुण कमी झाल्याची माहिती विभागीय मंडळातील सूत्रांनी दिली. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात विभागीय मंडळाचा निकाल १७ टक्क्यांनी वाढला आहे. तरीही कमी गुण पडल्याचा आक्षेप घेत ३२५ विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणी आणि ५९४ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत मागविल्या आहेत. 

उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देताना मंडळाकडून दिलेल्या गुणांची पुनर्मोजणी आणि तपासणी करूनच छायांकित प्रत दिली जाते. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिकांचाही समावेश आहे. पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची उत्तरपत्रिका नातेवाईक, मित्रमंडळींना दाखविण्यासाठी विद्यार्थी घेत असतात. त्यामुळे मंडळही अशा विषयांच्या उत्तरपत्रिका देताना काळजी घेते. या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी केली जाते. त्यात दहापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एका विषयाला पैकीच्या पैकी मिळालेले गुण कमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात संस्कृत, गणित, इतिहास आदी विषयांच्या उत्तरपत्रिकांचा समावेश आहे. मंडळाच्या नियमानुसार ही प्रक्रिया करण्यात येत असते. 

विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर पेपर सुरुवातीला मॉडरेटरकडे जातात. तेथून संबंधित विषयांच्या शिक्षकांकडे तपासणीला दिले जातात. तपासणी झाल्यानंतर दिलेल्या गुणांची पडताळणी मॉडरेटरकडून केली जाते. तेथून मंडळात उत्तरपत्रिका आणि गुणांची यादी आल्यानंतर कोणत्या प्रश्नाला किती गुण दिले याची पडताळणी केली जाते. राज्य मंडळाकडे यादी पाठविल्यानंतरही त्याठिकाणी प्रश्नाच्या गुणांनुसार पडताळणी होते. त्यानंतर निकाल जाहीर केला जातो. यात निकालातील गुणदानावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याची संधीही दिली जाते. यात बहुतांश नापास झालेले किंवा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागतात, असेही मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खेळाचे गुण पाठविण्यात शाळांची दिरंगाईदहावीच्या परीक्षेत खेळामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्यास १५ गुण देण्याची तरतूद आहे. यानुसार खेळातील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मुख्याध्यापक किंवा शाळेतील शिक्षकांनी क्रीडा अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागतात. हे प्रस्ताव तपासून क्रीडा अधिकारी विभागीय मंडळाकडे पाठवत असतो. मात्र, औरंगाबाद विभागीय बोर्डाची परीक्षा देणाऱ्या ३९ खेळाडूंचे प्रस्ताव पाठविण्यात शाळांनी दिरंगाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रस्ताव क्रीडा विभागाकडून मंडळाकडे पाठविण्यासही दिरंगाई झाली आहे. आता निकाल जाहीर झाला असून, या विद्यार्थ्यांचे भवितव्य राज्य मंडळाच्या हातात असणार आहे. या विद्यार्थ्यांना गुण मिळण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे पाठपुरावा करीत आहेत. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी