शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

वाटणीनंतरही, पालक मालमत्ता परत घेऊ शकतील ताब्यात; ज्येष्ठांसाठी विभागीय आयुक्तांचे पाऊल

By विकास राऊत | Updated: February 16, 2024 13:07 IST

तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : आयुष्यभर राबराब राबून पाल्यांना सुरक्षित आयुष्य देण्यासह मालमत्तेची वाटणी करून दिल्यानंतर तेच पाल्य मागे वळून आपल्या पालकांना पाहत नाहीत. मालमत्तेची वाटणी करून दिल्यानंतर त्यांचे जगणे कसे आहे, याकडे दुर्लक्ष करतात. अशा काही तक्रारी आल्यामुळे न्यायालयीन आदेशाचा आधार घेत ज्येष्ठांसाठी तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

शासनाच्या ९ जुलै २०१८च्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. तसेच केंद्र शासनाने आणलेला २००७ हा कायदा आई-वडील ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह कल्याणासाठी आहे. याचा आधार घेत आयुक्त राजेअर्दड यांनी परिपत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, मराठवाड्यातील सर्व तलाठी सजाअंतर्गत ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या आई - वडील, ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी, तहसील, मंडळ अधिकारी, तलाठी सजांमार्फत आवश्यक पावले उचलली जावीत.

कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तांचे सरंक्षण करण्याबाबत कृती आराखडा दिलेला आहे. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची तलाठ्यांनी महिन्यांतून एकदा भेट घ्यावी. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती करून वेळोवळी आढावा घ्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरी समन्वय संनियंत्रण समितीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त अनंत गव्हाणे, जगदीश मिनीयार, मातोश्री वृध्दाश्रमच्या संचालिका पद्मा तापडिया यांची उपस्थिती होती.

मालमत्तेच्या वाटणीपूर्वी हे पाहावे लागणारमहसुली अभिलेखात फेर होत असताना किंवा वाटणीच्या आधारे फेर करीत असताना आई - वडील, ज्येष्ठांच्या उदरनिर्वाहासाठी मालमत्ता ठेवली आहे की नाही, पालकांच्या पुढील आयुष्यात काळजीसंदर्भाने अटी व शर्ती नमूद केल्या आहेत का, याची शहानिशा करून मालमत्तेचा फेर घेण्यात यावा. महसूल अभिलेखात फेर घेऊन मालमत्तेची वाटणी झाल्यानंतर तलाठ्यांनी सजानिहाय खातरजमा करावी. मुले सांभाळत नसल्याची ज्येष्ठांनी तलाठ्यांकडे तोंडी तक्रार केली तरी त्याला लेखी स्वरूप देऊन तलाठ्यांनी वरिष्ठांकडे सादर करावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSenior Citizenज्येष्ठ नागरिक