शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाटणीनंतरही, पालक मालमत्ता परत घेऊ शकतील ताब्यात; ज्येष्ठांसाठी विभागीय आयुक्तांचे पाऊल

By विकास राऊत | Updated: February 16, 2024 13:07 IST

तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : आयुष्यभर राबराब राबून पाल्यांना सुरक्षित आयुष्य देण्यासह मालमत्तेची वाटणी करून दिल्यानंतर तेच पाल्य मागे वळून आपल्या पालकांना पाहत नाहीत. मालमत्तेची वाटणी करून दिल्यानंतर त्यांचे जगणे कसे आहे, याकडे दुर्लक्ष करतात. अशा काही तक्रारी आल्यामुळे न्यायालयीन आदेशाचा आधार घेत ज्येष्ठांसाठी तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

शासनाच्या ९ जुलै २०१८च्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. तसेच केंद्र शासनाने आणलेला २००७ हा कायदा आई-वडील ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाह कल्याणासाठी आहे. याचा आधार घेत आयुक्त राजेअर्दड यांनी परिपत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, मराठवाड्यातील सर्व तलाठी सजाअंतर्गत ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या आई - वडील, ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कायद्यानुसार उपविभागीय अधिकारी, तहसील, मंडळ अधिकारी, तलाठी सजांमार्फत आवश्यक पावले उचलली जावीत.

कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तांचे सरंक्षण करण्याबाबत कृती आराखडा दिलेला आहे. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची तलाठ्यांनी महिन्यांतून एकदा भेट घ्यावी. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती करून वेळोवळी आढावा घ्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा ज्येष्ठ नागरी समन्वय संनियंत्रण समितीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपायुक्त अनंत गव्हाणे, जगदीश मिनीयार, मातोश्री वृध्दाश्रमच्या संचालिका पद्मा तापडिया यांची उपस्थिती होती.

मालमत्तेच्या वाटणीपूर्वी हे पाहावे लागणारमहसुली अभिलेखात फेर होत असताना किंवा वाटणीच्या आधारे फेर करीत असताना आई - वडील, ज्येष्ठांच्या उदरनिर्वाहासाठी मालमत्ता ठेवली आहे की नाही, पालकांच्या पुढील आयुष्यात काळजीसंदर्भाने अटी व शर्ती नमूद केल्या आहेत का, याची शहानिशा करून मालमत्तेचा फेर घेण्यात यावा. महसूल अभिलेखात फेर घेऊन मालमत्तेची वाटणी झाल्यानंतर तलाठ्यांनी सजानिहाय खातरजमा करावी. मुले सांभाळत नसल्याची ज्येष्ठांनी तलाठ्यांकडे तोंडी तक्रार केली तरी त्याला लेखी स्वरूप देऊन तलाठ्यांनी वरिष्ठांकडे सादर करावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSenior Citizenज्येष्ठ नागरिक