शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आदेशानंतरही मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:13 IST

: जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता दिला. हा आदेश तात्काळ अमलात आणण्याची गरज असताना राजकीय दबावापोटी केवळ पूर्वतयारीच्या नावाखाली पाणी सोडण्यास विलंब करण्यात येत असल्यामुळे मराठवाड्यातून संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदोन दिवस उलटले : अवघ्या मराठवाड्याचे पाण्याकडे लक्ष, पूर्वतयारीच्या नावाखाली चालढकल

औरंगाबाद : जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता दिला. हा आदेश तात्काळ अमलात आणण्याची गरज असताना राजकीय दबावापोटी केवळ पूर्वतयारीच्या नावाखाली पाणी सोडण्यास विलंब करण्यात येत असल्यामुळे मराठवाड्यातून संताप व्यक्त होत आहे.जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्याच्या निर्णयाला प्रारंभीपासून विरोध होत आहे. याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत याचिका दाखल केली; परंतु न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. पुनर्विचार याचिका दाखल करण्यास अथवा सर्वोच्च न्यायालयात जाण्यास उच्च न्यायालयाने सांगितले. दिवाळीच्या सुटीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी काही लोकप्रतिनिधींनी भेट घेऊन पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली. पाणी सोडले जाईल, असेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तरीही वरच्या धरणांतून बुधवारी सायंक ाळपर्यंत पाणी सोडण्यासंदर्भात प्रत्यक्षात काहीही हालचाली झाल्या नाहीत.ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरण समूहातून पाणी विसर्ग सोडण्याबाबत नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नाशिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांची आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी यासंदर्भात मंगळवारी सकाळी आदेश दिलेले आहेत. नाशिक, नगर जिल्ह्यांतून पाणी सोडण्यास प्रचंड विरोध होत आहे. राजकीय दबावापोटी पूर्वतयारीच्या नावाखाली पाणी सोडण्यास विलंब व्हावा आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, त्यातून पाणी सोडणे थांबेल, यासाठी खटाटोप केला जात आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी दोन दिवसांनंतरही अडलेलेच आहे.मराठवाड्यातही आंदोलनपरभणी जिल्ह्यातील शेतकºयांनी समन्यायी पाणी वाटपानुसार ऊर्ध्व धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात बुधवारी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातही आंदोलन पेटण्याची भीती व्यक्त होत आहे.जबाबदारी नाशिकचीपाणी सोडण्याचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही नाशिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतांची आहे. त्यामुळे पुढची सर्व जबाबदारी त्यांची आहे. पाणी कधी सोडले जाईल, याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.-अजय कोहीरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळपाणी सोडावेच लागेलपाणी तर सोडावेच लागेल. शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची कालच भेट घेतली. आदेश निघाल्याने पाणी सोडले जाईल, असे त्यांनी सांगितले. आदेशाची अंमबजावणी लवकरात लवकर व्हावी. तिकडे लोक एकत्र असतील तर आम्हीही सर्वपक्षीय लोक एकत्र आहोत. पाणी सोडले नाही तर सर्वसामान्य लोक रस्त्यावर येतील.-आ. अब्दुल सत्तारसुप्रिम कोर्टात दादकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागेल. शिवाय पाणी सोडण्यासंदर्भातील एक प्रकरण सुप्रिम कोर्टात गेले आहे; परंतु तरीही पाणी सुटेल. काम कुठेही थांबलेले नाही. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पूर्वतयारी सुरू आहे.-आ. प्रशांत बंब

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई