शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘मेगा’ दुरुस्तीनंतरही विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:29 IST

दहा तास अंधारात राहण्याची भीमनगर-भावसिंगपुऱ्यातील नागरिकांना शिक्षा

ठळक मुद्देकेबल उपलब्ध नसल्यामुळे झाला उशीर केबल जळाल्यामुळे १० तास नागरिक अंधारात

औरंगाबाद : छावणी उपविभागांतर्गत भीमनगर-भावसिंगपुरा या नागरी वसाहतीला विद्युत पुरवठा करणारी वाहिनी जळाल्यामुळे त्या परिसरातील वीजपुरवठा तब्बल दहा तास बंद होता. याशिवाय सिल्कमिल कॉलनी परिसरातील केबल जळाल्यामुळे बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्यामुळे त्या भागातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. 

छावणी उपविभागाच्या अंतर्गत भीमनगर- भावसिंगपुरा या परिसराला विद्युत पुरवठा करणारी केबल जळाल्यामुळे बुधवारी सकाळी ६ वाजेपासून वीजपुरवठा बंद झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती छावणी उपविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर जळालेल्या केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास सात- आठ तासांचा कालावधी लागल्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. जळालेल्या केबलच्या जागी नवीन केबल टाकण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिल्कमिल कॉलनी परिसरातील केबल जळाल्यामुळे या भागात अंधार पसरला. रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत झाला नाही. वीजपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी उकाडा व मच्छरांचा त्रास सहन करावा लागला. गुरुवारी दुपारपर्यंत या  भागातील वीजपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते; मात्र रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. 

केबल उपलब्ध नसल्यामुळे झाला उशीरछावणी उपविभागाचे अतिरिक्त अभियंता चिंचाणे यांच्याशी संपर्क  साधला असता ते म्हणाले, भीमनगर येथील केबल जळाली होती. त्यानंतर सिल्कमिल कॉलनी येथीलही केबलच जळाली. केबल उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबत वरिष्ठ कार्यालयांकडे मागणी करण्यात आली. कंडक्टर तुटले तर ते लगेच दुरुस्त केले जाते; पण केबल जळाल्यास ती तात्काळ बदलता येत नाही. केबल उपलब्ध झाल्यानंतर युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली. संपूर्ण केबल बदलावी लागत असल्यामुळे उशीर होणे अपरिहार्य आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAurangabadऔरंगाबाद