शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

चार दिवसानंतरही निळवंडेचे पाणी जायकवाडीत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:33 IST

निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देहक्काचे पाणी : पाणी अडविल्याची माहिती पोहोचली शासनापर्यंत

औरंगाबाद : निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.निळवंडेतून १४ नोव्हेंबरपासून २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून सुरू असलेला निळवंडेचा हा विसर्ग शनिवारीदेखील कायम होता; परंतु त्यापुढे पाणी वळविण्याच्या उद्योगाने जायकवाडीत काही केल्या पाणी पोहोचत नसल्याचे दिसते. निळवंडेच्या पुढे ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. येथून कालव्याला पाणी सोडणे सुरूच आहे. कालवे काही केल्या बंद होत नसल्याने जायकवाडीला येणाºया पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाला आहे.ओझर बंधाºयास छोटे-मोठे बंधारे आहेत. हे बंधारेही भरून घेण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती समजते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जायकवाडीत प्रत्यक्ष पोहोचलेले पाणी, वहन व्यय आदी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करण्याची सूचना कार्यकारी संचालकांनी केली होती. त्यानुसार ही माहिती सादर करण्यात आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. जायकवाडीला पोहोचलेल्या पाण्याचा हिशोब शासनास सादर झाला आहे. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी वरच्या भागात पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारवाई केली जात आहे; परंतु प्रत्यक्षात पाणी पळविण्यास जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. निळवंडेचे पाणी रविवारी पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भेरडापूरपर्यंत आले पाणीजायकवाडीसाठी सोडलेले पाणी शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु प्रत्यक्षात येथे शुक्रवारी पाणी पोहोचलेच नाही. भेरडापूरपर्यंत शनिवारी पाणी पोहोचल्याची माहिती ‘कडा’तर्फे देण्यात आली. भेरडापूर येथून पुढे आणखी तीन बंधारे आहेत. त्यामुळे हे बंधारेही भरून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण