शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
5
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
6
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
7
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
8
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
9
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
10
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
11
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
12
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
13
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
14
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
15
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
16
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
17
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
18
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
19
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
20
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसानंतरही निळवंडेचे पाणी जायकवाडीत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:33 IST

निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देहक्काचे पाणी : पाणी अडविल्याची माहिती पोहोचली शासनापर्यंत

औरंगाबाद : निळवंडेतून सोडण्यात आलेले पाणी चार दिवसांनंतरही जायकवाडी धरणात पोहोचलेले नाही. कालव्याला पाणी सोडणे, बंधारे भरून घेण्याच्या प्रकाराने जायकवाडीकडे येणारा पाण्याचा प्रवाह अतिशय संथ आहे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडविले आणि वळविल्याची माहिती शासनाला देण्यात आल्याची माहिती ‘कडा’च्या सूत्रांनी दिली.निळवंडेतून १४ नोव्हेंबरपासून २ हजार क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात येत आहे. चार दिवसांपासून सुरू असलेला निळवंडेचा हा विसर्ग शनिवारीदेखील कायम होता; परंतु त्यापुढे पाणी वळविण्याच्या उद्योगाने जायकवाडीत काही केल्या पाणी पोहोचत नसल्याचे दिसते. निळवंडेच्या पुढे ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग सुरूआहे. येथून कालव्याला पाणी सोडणे सुरूच आहे. कालवे काही केल्या बंद होत नसल्याने जायकवाडीला येणाºया पाण्याचा प्रवाह आणि वेग कमी झाला आहे.ओझर बंधाºयास छोटे-मोठे बंधारे आहेत. हे बंधारेही भरून घेण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती समजते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जायकवाडीत प्रत्यक्ष पोहोचलेले पाणी, वहन व्यय आदी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करण्याची सूचना कार्यकारी संचालकांनी केली होती. त्यानुसार ही माहिती सादर करण्यात आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. जायकवाडीला पोहोचलेल्या पाण्याचा हिशोब शासनास सादर झाला आहे. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रकार होऊ नये, यासाठी वरच्या भागात पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारवाई केली जात आहे; परंतु प्रत्यक्षात पाणी पळविण्यास जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. निळवंडेचे पाणी रविवारी पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भेरडापूरपर्यंत आले पाणीजायकवाडीसाठी सोडलेले पाणी शुक्रवारी नेवासा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु प्रत्यक्षात येथे शुक्रवारी पाणी पोहोचलेच नाही. भेरडापूरपर्यंत शनिवारी पाणी पोहोचल्याची माहिती ‘कडा’तर्फे देण्यात आली. भेरडापूर येथून पुढे आणखी तीन बंधारे आहेत. त्यामुळे हे बंधारेही भरून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण