शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आठ दिवसांनंतरही संकेत जायभायेचे साथीदार सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:03 IST

मित्राला कारखाली चिरडून मारणाऱ्या संकेत प्रल्हाद जायभायेसोबत कारमध्ये असलेले त्याचे तीन साथीदार घटनेच्या आठ दिवसांनंतरही पोलिसांना सापडले नाहीत.

औरंगाबाद : मित्राला कारखाली चिरडून मारणाऱ्या संकेत प्रल्हाद जायभायेसोबत कारमध्ये असलेले त्याचे तीन साथीदार घटनेच्या आठ दिवसांनंतरही पोलिसांना सापडले नाहीत. त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मृत संकेत कुलकर्णी यांच्या नातेवाईकांनी केली. 

संकेत संजय कुलकर्णी (रा. पाथरी, जि. परभणी) या तरुणाची २३ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेकडो लोकांच्या नजरेसमोर आरोपी संकेत जायभायेने कारखाली चिरडून हत्या केली. तेव्हा आरोपी संकेतसोबत विजय जौक (रा. बाळापूर), उमर पटेल आणि संकेत मचे (रा. देवळाई चौैक परिसर) हे कारमध्ये होते. संकेतचे कारमधून अपहरण करून त्यास धडा शिकविण्यासाठी ते एकत्र आले होते. मात्र, संकेत त्यांच्या कारमध्ये बसला नाही आणि तो दुचाकीने तेथून निघून जात असताना आरोपी जायभायेने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर तीन ते चार वेळा कारखाली चिरडून ठार केले.

संकेतला कारखाली वारंवार चिरडत असताना त्याच्या मित्रांनी आणि काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या अंगावरही कार घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र, कारमध्ये बसलेल्या त्याच्या साथीदारांनी जायभायेला रोखले असते, तर ही घटना टाळता आली असती. त्याच्या साथीदारांनी त्याला रोखले नाही, उलट त्यांनी त्याला साथ दिली आणि त्याला घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले. एवढेच नव्हे तर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी जायभायेच्या मोबाईलचे सीम गायब केले. घटनेपासून सर्व आरोपी पसार झाले. त्यांनी त्यांचे मोबाईल बंद ठेवलेले आहेत. तीन पथक ांतील अधिकारी-कर्मचारी  आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र, आठ दिवसांनंतरही आरोपींचा कोणताही माग पोलिसांना मिळू शकला नाही, हे विशेष.