शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही शिक्षकांचे होते लक्ष; राजकारण, समाजकारणात त्यांच्या संस्काराचा झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:27 IST

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रवेश केला. तेव्हा कोणीही गुरू नव्हते. जनता हीच गुरू, मार्गदर्शक म्हणून समोर आली. याच जनतारूपी गुरूचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनानुसार आगामी काळात वाटचाल सुरू राहील.

ठळक मुद्देजीवन घडविणाऱ्या शिक्षकांच्या तीन पिढ्यांसोबत ऋणानुबंध कायमराजकारणात जनता हीच गुरू

औरंगाबाद : शालेय जीवनात शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर राजकारण, शिक्षण, समाजकारणात झेप घेता आली.  या शिक्षकांसोबत त्यांच्या शेवटपर्यंत नियमित संपर्क होता. आता त्या शिक्षकांच्या तीन पिढ्या होत आहेत. त्या सर्वांसोबत ऋणानुबंध कायम असल्याची कृतज्ञता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली.

घरकाम करून ज्ञान मिळविलेमाझ्या गावातील प्राथमिक शाळेत मुरलीधर वामन वाणी हे शिक्षक होते. ते १० वर्षे गावात होते. पहिली ते चौथीच्या वर्गाला तेव्हा एकच शिक्षक होता. या शिक्षकांच्या घरी पाणी आणून देणे, घर सारवणे, दूध आणून देणे, चहा करून देण्यासह इतर घरकामे आवडीने करायचो. त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. फक्त घरकामेच करीत नव्हतो, तर गुरुजी उरलेल्या वेळेत मला ट्यूशन टाईप घरीच शिकवायचे. चौथी पास झाल्यावर गावात शाळा नव्हती, म्हणून औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण येथे शिकायला जाण्यास सांगितले. त्या गावापासून मामाचे गाव पाच किलोमीटर अंतरावर होते. तेव्हा वाणी गुरुजींनी नायगव्हाणच्या शाळेतील पाटील सरांना सांगून माझ्यावर लक्ष ठेवायला लावले. वाणी गुरुजींनी गावात तर काळजी घेतलीच; पण दुसरीकडे गेल्यावरही काळजी घेतली. एवढे प्रेम माझ्यावर शिक्षकांनी केले.

वाटचाल सुकर शिक्षकरूपी गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाटचाल ही सुकर होत गेली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचा मला समाजकारण व राजकारणातही फायदा झाला. सामाजिक जीवन असो वा राजकारण जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आणि माझे नेतृत्व विकसित होत गेले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आतापर्यंत वाटचाल करीत आलो आहे. यापुढेही शिक्षकांचे व त्यांच्या पुढील पिढ्यांशी संबंध कायम राहतील. 

शिक्षकांच्या विचारांचा पगडा अजूनहीशिक्षकांच्या संस्काराचा फायदा, त्यांची शिकवण आणि विचारांचा पगडा अजूनही माझ्यावर आहे. त्यांचा मला व्यावहारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात फायदा झाला. त्यांची तिसरी पिढी आहे. त्यांच्याही संपर्कात आहे. हा संपर्क कायम राहील.

कौटुंबिक संबंध निर्माण झाले वाणी गुरुजी सोयगाव तालुक्यातील गोंदेगावचे होते. ते असताना त्यांना भेटायला नेहमी जात होतो. आजही त्यांच्या पत्नी, मुलांकडे जातो. म्हणजे शाळेत आहेत तोपर्यंत रिलेशन नाही, तर त्यानंतरही रिलेशन आहेत. घरघुगती संबंध होते. यांच्यासह युसूफ रहमान पटेल, जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील परिहार सर, दाभाडीचे गव्हाड सर, आहेर सर असे शिक्षक आणखी स्मरणात आहेत.

राजकारणात जनता हीच गुरूमाझ्या घरात, नात्यात कोणीही राजकारणात नव्हते. मला मतदारांनीच घडवले. गावाचा सरपंच केले तेव्हा गावाने घडवले. तालुक्याचा सभापती झालो, तेव्हा तालुक्यातील जनतेने मदत केली. पुढे जाफराबाद-भोकरदन तालुक्याचा आमदार झालो तेव्हाही त्या लोकांनी प्रेम केले. त्यानंतर पाच टर्म झाले जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. एकूण ३५ वर्षे आमदार-खासदार आहे. यात माझे फार काम आहे हे म्हणण्यापेक्षा लोकांनीच माझे नेतृत्व विकसित केले आहे. गत ३५ वर्षांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे लोकांचे अमाप प्रेम मिळाले. लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि सांगतील ती कामे केल्यामुळे प्रेम करतात. 

यशस्वी जीवनासाठी योग्य मार्गदर्शक आवश्यक  असतो. त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात समाधानी राहत आलो आहे. कुटुंब, राजकारण, समाजकारणात समाधानी जीवन जगत आहे. आयुष्य जगत असताना यापेक्षा अधिक काय असायला हवे. - रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री  

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेTeachers Dayशिक्षक दिनAurangabadऔरंगाबाद