शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही शिक्षकांचे होते लक्ष; राजकारण, समाजकारणात त्यांच्या संस्काराचा झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:27 IST

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रवेश केला. तेव्हा कोणीही गुरू नव्हते. जनता हीच गुरू, मार्गदर्शक म्हणून समोर आली. याच जनतारूपी गुरूचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनानुसार आगामी काळात वाटचाल सुरू राहील.

ठळक मुद्देजीवन घडविणाऱ्या शिक्षकांच्या तीन पिढ्यांसोबत ऋणानुबंध कायमराजकारणात जनता हीच गुरू

औरंगाबाद : शालेय जीवनात शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर राजकारण, शिक्षण, समाजकारणात झेप घेता आली.  या शिक्षकांसोबत त्यांच्या शेवटपर्यंत नियमित संपर्क होता. आता त्या शिक्षकांच्या तीन पिढ्या होत आहेत. त्या सर्वांसोबत ऋणानुबंध कायम असल्याची कृतज्ञता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली.

घरकाम करून ज्ञान मिळविलेमाझ्या गावातील प्राथमिक शाळेत मुरलीधर वामन वाणी हे शिक्षक होते. ते १० वर्षे गावात होते. पहिली ते चौथीच्या वर्गाला तेव्हा एकच शिक्षक होता. या शिक्षकांच्या घरी पाणी आणून देणे, घर सारवणे, दूध आणून देणे, चहा करून देण्यासह इतर घरकामे आवडीने करायचो. त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. फक्त घरकामेच करीत नव्हतो, तर गुरुजी उरलेल्या वेळेत मला ट्यूशन टाईप घरीच शिकवायचे. चौथी पास झाल्यावर गावात शाळा नव्हती, म्हणून औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण येथे शिकायला जाण्यास सांगितले. त्या गावापासून मामाचे गाव पाच किलोमीटर अंतरावर होते. तेव्हा वाणी गुरुजींनी नायगव्हाणच्या शाळेतील पाटील सरांना सांगून माझ्यावर लक्ष ठेवायला लावले. वाणी गुरुजींनी गावात तर काळजी घेतलीच; पण दुसरीकडे गेल्यावरही काळजी घेतली. एवढे प्रेम माझ्यावर शिक्षकांनी केले.

वाटचाल सुकर शिक्षकरूपी गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाटचाल ही सुकर होत गेली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या संस्कारांचा मला समाजकारण व राजकारणातही फायदा झाला. सामाजिक जीवन असो वा राजकारण जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आणि माझे नेतृत्व विकसित होत गेले. या संस्कारांच्या शिदोरीवरच आतापर्यंत वाटचाल करीत आलो आहे. यापुढेही शिक्षकांचे व त्यांच्या पुढील पिढ्यांशी संबंध कायम राहतील. 

शिक्षकांच्या विचारांचा पगडा अजूनहीशिक्षकांच्या संस्काराचा फायदा, त्यांची शिकवण आणि विचारांचा पगडा अजूनही माझ्यावर आहे. त्यांचा मला व्यावहारिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात फायदा झाला. त्यांची तिसरी पिढी आहे. त्यांच्याही संपर्कात आहे. हा संपर्क कायम राहील.

कौटुंबिक संबंध निर्माण झाले वाणी गुरुजी सोयगाव तालुक्यातील गोंदेगावचे होते. ते असताना त्यांना भेटायला नेहमी जात होतो. आजही त्यांच्या पत्नी, मुलांकडे जातो. म्हणजे शाळेत आहेत तोपर्यंत रिलेशन नाही, तर त्यानंतरही रिलेशन आहेत. घरघुगती संबंध होते. यांच्यासह युसूफ रहमान पटेल, जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयातील परिहार सर, दाभाडीचे गव्हाड सर, आहेर सर असे शिक्षक आणखी स्मरणात आहेत.

राजकारणात जनता हीच गुरूमाझ्या घरात, नात्यात कोणीही राजकारणात नव्हते. मला मतदारांनीच घडवले. गावाचा सरपंच केले तेव्हा गावाने घडवले. तालुक्याचा सभापती झालो, तेव्हा तालुक्यातील जनतेने मदत केली. पुढे जाफराबाद-भोकरदन तालुक्याचा आमदार झालो तेव्हाही त्या लोकांनी प्रेम केले. त्यानंतर पाच टर्म झाले जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. एकूण ३५ वर्षे आमदार-खासदार आहे. यात माझे फार काम आहे हे म्हणण्यापेक्षा लोकांनीच माझे नेतृत्व विकसित केले आहे. गत ३५ वर्षांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे लोकांचे अमाप प्रेम मिळाले. लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि सांगतील ती कामे केल्यामुळे प्रेम करतात. 

यशस्वी जीवनासाठी योग्य मार्गदर्शक आवश्यक  असतो. त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात समाधानी राहत आलो आहे. कुटुंब, राजकारण, समाजकारणात समाधानी जीवन जगत आहे. आयुष्य जगत असताना यापेक्षा अधिक काय असायला हवे. - रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री  

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेTeachers Dayशिक्षक दिनAurangabadऔरंगाबाद