शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.

ठळक मुद्देप्रा. श्रीकिशन मोरे : मा.प. विधि महाविद्यालयात व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मा.प. विधि महाविद्यालयात तीनदिवसीय संविधान प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी सायंकाळी ‘संविधान निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवाद’ या विषयारील पहिले पुष्प प्रा. श्रीकिशन मोरे यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एम. राव होते. सुरुवातीला प्रा. ललिता पवार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.प्रा. मोरे आपल्या व्याख्यानात म्हणाले, २६ नोव्हेंबर १९५० रोजी भारतीय संविधान अमलात आले. त्यापूर्वी या देशातील समाजव्यवस्थेचा विचार झाला पाहिजे. या देशातील अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. अंगात वस्त्र परिधान करण्याचा अधिकार नव्हता. जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्यांना दिली जात होती. देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अस्तित्वात होती; पण अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी सामाजिक चळवळ अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या समाजाला अधिकार प्राप्त करून दिले. यापूर्वी १९३० मध्ये गोलमेज परिषेदसमोर बाबासाहेबांनी अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरली. या मागणीला महात्मा गांधी यांनी कडाडून विरोध केला. एकीकडे महात्मा गांधी हे अस्पृशांच्या हक्कासाठी काम करीत आणि दुसरीकडे, अस्पृशांच्या अधिकाराला विरोध करीत. त्यामुळे बाबासाहेब हे गांधीजींचे वैचारिक विरोधक होते. बाबासाहेबांनी नोकरीत राखीव जागांचा आग्रह धरला, तसा मंत्रिमंडळातही राखीव जागांचा आग्रह धरला होता.त्यानंतर संविधानसभेसमोर बाबासाहेबांनी आपले विचार प्रकट केले. तेथेही बाबासाहेबांना विरोध करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; पण बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. मोठे कायदेपंडित होते. त्यांनी एकेक मुद्दा पटवून सांगितला. एकसंघ राष्ट्र कसे उभे राहील, याबद्दल सविस्तरपणे भूमिका मांडली. या देशातील महत्त्वाचे उद्योग हे राज्याच्या मालकीचे असावेत. कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या देशातील संपूर्ण जमीन ही देशाच्या मालकीची असली पाहिजे व येथील नागरिकांना तिचे समान वाटप झाले पाहिजे. जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले पाहिजेत. बाबासाहेबांचा हा विचार जर अमलात आला असता, तर देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी रक्तविरहित सामाजिक क्रांती आणली, असे विचार प्रा. मोरे यांनी मांडले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रBuddhist Circuitsबुद्धिस्ट सर्किट