शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.

ठळक मुद्देप्रा. श्रीकिशन मोरे : मा.प. विधि महाविद्यालयात व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मा.प. विधि महाविद्यालयात तीनदिवसीय संविधान प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी सायंकाळी ‘संविधान निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवाद’ या विषयारील पहिले पुष्प प्रा. श्रीकिशन मोरे यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एम. राव होते. सुरुवातीला प्रा. ललिता पवार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.प्रा. मोरे आपल्या व्याख्यानात म्हणाले, २६ नोव्हेंबर १९५० रोजी भारतीय संविधान अमलात आले. त्यापूर्वी या देशातील समाजव्यवस्थेचा विचार झाला पाहिजे. या देशातील अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. अंगात वस्त्र परिधान करण्याचा अधिकार नव्हता. जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्यांना दिली जात होती. देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अस्तित्वात होती; पण अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी सामाजिक चळवळ अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या समाजाला अधिकार प्राप्त करून दिले. यापूर्वी १९३० मध्ये गोलमेज परिषेदसमोर बाबासाहेबांनी अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरली. या मागणीला महात्मा गांधी यांनी कडाडून विरोध केला. एकीकडे महात्मा गांधी हे अस्पृशांच्या हक्कासाठी काम करीत आणि दुसरीकडे, अस्पृशांच्या अधिकाराला विरोध करीत. त्यामुळे बाबासाहेब हे गांधीजींचे वैचारिक विरोधक होते. बाबासाहेबांनी नोकरीत राखीव जागांचा आग्रह धरला, तसा मंत्रिमंडळातही राखीव जागांचा आग्रह धरला होता.त्यानंतर संविधानसभेसमोर बाबासाहेबांनी आपले विचार प्रकट केले. तेथेही बाबासाहेबांना विरोध करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; पण बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. मोठे कायदेपंडित होते. त्यांनी एकेक मुद्दा पटवून सांगितला. एकसंघ राष्ट्र कसे उभे राहील, याबद्दल सविस्तरपणे भूमिका मांडली. या देशातील महत्त्वाचे उद्योग हे राज्याच्या मालकीचे असावेत. कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या देशातील संपूर्ण जमीन ही देशाच्या मालकीची असली पाहिजे व येथील नागरिकांना तिचे समान वाटप झाले पाहिजे. जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले पाहिजेत. बाबासाहेबांचा हा विचार जर अमलात आला असता, तर देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी रक्तविरहित सामाजिक क्रांती आणली, असे विचार प्रा. मोरे यांनी मांडले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रBuddhist Circuitsबुद्धिस्ट सर्किट