शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन; कुलगुरूंनी अर्थसंकल्पात केली ५० लाख रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 18:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे.

ठळक मुद्देया संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था महिनाभरात कार्यान्वित करण्याचा निर्णय याविषयी स्थापन केलेल्या समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी दिली. या संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

विलासराव देशमुख यांचे मराठवाड्याच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने विद्यापीठात संशोधन संस्था स्थापन करण्याचा ठराव विद्यापीठाच्या २० मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला होता. या ठरावानुसार याविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. या बैठकीला समितीचे सदस्य पंकज भारसाखळे, विजय सुबुकडे उपस्थित होते, तर संजय निंबाळकर, प्रा. संभाजी भोसले हे अनुपस्थित होते. मात्र, त्यांना बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. देहाडे यांनी सांगितले. 

विलासराव देशमुख संशोधन संस्थेच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी खाजगी संस्थेकडून महिनाभरात एक सविस्तर अहवाल तयार करून घ्यावा, संस्थेचा संचालक नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि विलासराव देशमुख यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या मान्यतेसाठी एक प्रस्ताव राज्य सरकारला आणि निधीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. देहाडे यांनी दिली.

ग्रामीण संशोधनासाठी तीन संस्थाविद्यापीठात ग्रामीण भागातील समस्या, शेती उपायांवर संशोधन करण्यासाठी चार वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला दीडशे कोटी रुपये निधी देण्याची घोषणा २०१६ मध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. तेव्हापासून आतापर्यंत एक रुपयाही सरकारने दिला नाही. या संस्थेत मागील शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नव्हता. याशिवाय विद्यापीठात ग्रामीण विकास अध्यासन केंद्रही कार्यान्वित केलेले आहे. यानंतर विलासराव देशमुख संशोधन संस्था ही ग्रामीण भागावर संशोधन करणारी तिसरी संस्था असणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRural Developmentग्रामीण विकास