शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विद्यापीठात विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन; कुलगुरूंनी अर्थसंकल्पात केली ५० लाख रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 18:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे.

ठळक मुद्देया संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था महिनाभरात कार्यान्वित करण्याचा निर्णय याविषयी स्थापन केलेल्या समितीने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी दिली. या संस्थेसाठी कुलगुरूंनी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.

विलासराव देशमुख यांचे मराठवाड्याच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने विद्यापीठात संशोधन संस्था स्थापन करण्याचा ठराव विद्यापीठाच्या २० मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला होता. या ठरावानुसार याविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीची पहिली बैठक बुधवारी झाली. या बैठकीला समितीचे सदस्य पंकज भारसाखळे, विजय सुबुकडे उपस्थित होते, तर संजय निंबाळकर, प्रा. संभाजी भोसले हे अनुपस्थित होते. मात्र, त्यांना बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. देहाडे यांनी सांगितले. 

विलासराव देशमुख संशोधन संस्थेच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी खाजगी संस्थेकडून महिनाभरात एक सविस्तर अहवाल तयार करून घ्यावा, संस्थेचा संचालक नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि विलासराव देशमुख यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या मान्यतेसाठी एक प्रस्ताव राज्य सरकारला आणि निधीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. देहाडे यांनी दिली.

ग्रामीण संशोधनासाठी तीन संस्थाविद्यापीठात ग्रामीण भागातील समस्या, शेती उपायांवर संशोधन करण्यासाठी चार वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला दीडशे कोटी रुपये निधी देण्याची घोषणा २०१६ मध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. तेव्हापासून आतापर्यंत एक रुपयाही सरकारने दिला नाही. या संस्थेत मागील शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नव्हता. याशिवाय विद्यापीठात ग्रामीण विकास अध्यासन केंद्रही कार्यान्वित केलेले आहे. यानंतर विलासराव देशमुख संशोधन संस्था ही ग्रामीण भागावर संशोधन करणारी तिसरी संस्था असणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादRural Developmentग्रामीण विकास