शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या धर्तीवर देशात खंडपीठांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:55 IST

देशात अलीकडच्या काळात स्थापन झालेले जे खंडपीठ आहेत, ते औरंगाबाद खंडपीठाची प्रेरणा घेऊनच अस्तित्वात आले आहेत़, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय यू. ललित यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्राच्या निर्मितीपासून नागपूरला खंडपीठ आहे. आजपर्यंत जेवढे उच्च न्यायालय झाले ती ‘रि आॅर्गनायझेशन’च्या वेळी तयार झाली. औरंगाबादेत मात्र पहिल्यांदा नव्या दिशेने पाऊल पडले. हे औरंगाबाद मॉडेल आता पूर्ण देशात राबविण्यात येत आहे. देशात अलीकडच्या काळात स्थापन झालेले जे खंडपीठ आहेत, ते औरंगाबाद खंडपीठाची प्रेरणा घेऊनच अस्तित्वात आले आहेत़, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय यू. ललित यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि.३) सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती शंतनू केमकर, न्यायमूर्ती रवींद्र एम. बोर्डे, अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल आॅफ इंडिया अनिल सिंग, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र एम. देशमुख, उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र डी. सानप, अ‍ॅड. संघमित्रा वडमारे, सचिव अ‍ॅड. आनंदसिंह बायस उपस्थित होते. प्रारंभी न्या. उदय यू. ललित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमात मान्यवरांनी इंग्रजीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले़ मात्र, न्या. ललित जेव्हा मार्गदर्शनासाठी आले तेव्हा, त्यांनी मराठी बोलले तर चालेल का असा प्रश्न करताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यानंतर २१ वर्षांनी १९८१ साली ‘रि आॅर्गनायझेशन अ‍ॅक्ट’खाली औरंगाबादेत नवीन खंडपीठ सुरू करण्यावर आक्षेप होता; परंतु हा आक्षेप सर्वोच न्यायालयाने रद्द केला. औरंगाबाद मॉडेल पुढे मदुराई, गुलबर्गा, धारवाडसाठी राबविण्यात आले. मेघालय, मणिपूर, त्रिपुरा येथेही ‘रि आॅर्गनायझेशन अ‍ॅक्ट’वरून अधिकार घेऊन नवीन उच्च न्यायालय तयार केले. औरंगाबादसाठी ही अभिमानाची बाब आहे. हे एक हेरिटेज आहे. येथील सर्व वकील हे तरुण आहेत. तारुण्य, उत्साह, प्रावीण्य ही तुमची ताकद आहे. ती कुठेही कमी होऊ देऊ नका. औरंगाबादेत खूप क्षमता आहे, तरुणाईआहे. नागपूरपेक्षाही अधिक क्षमता असून ती कायम ठेवा, असे न्या. ललित म्हणाले.यावेळी न्यायमूर्ती रवींद्र एम. बोर्डे,न्यायमूर्ती नरेश पाटील, अनिल सिंग यांनी मार्गदर्शन केले. न्या़ बोर्डे यांनी खंडपीठाच्या वाढत्या व्यापाबाबत कारणमीमांसा केली़ केवळ एका शब्दातील फरकासाठी याचिका दाखल होत असल्याबाबत त्यांनी लक्ष वेधले़ न्यायालयीन प्रक्रिया, इमारत बांधकाम आदींबाबत कामे यांची माहिती त्यांनी दिली़मराठवाड्यातील सर्वसामान्य माणसाला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी खंडपीठाची स्थापना झाली. भविष्याच्या दृष्टीने मास्टर प्लॅन तयार केले पाहिजे, असे अनिल सिंग म्हणाले. अ‍ॅड. प्रवीण शहा, अ‍ॅड. रमेश एन. धोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. रवींद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. आनंदसिंह बायस यांनी आभार मानले.