शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्ध प्रभावी लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा; खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:40 IST

कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यातून २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करावी.उपलब्ध बेडची माहिती अद्ययावत ठेवून ते उपलब्धतेसाठी नियंत्रक नेमावेत. शुल्काबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करावी.

औरंगाबाद : कोविड-१९ विरोधात प्रभावी लढ्याकरिता  १२ जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. १८)  दिले आहेत.

कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करावी आणि त्या क्रमांकांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. खासगी रुग्णालयांमधून उपलब्ध बेडची माहिती अद्ययावत ठेवून ते उपलब्धतेसाठी नियंत्रक नेमावेत. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये समानता असावी. रुग्णांकरिता आवश्यक रुग्णवाहिका उपलब्ध असतील याची काळजी घ्यावी, तसेच त्यासंदर्भातील फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करावी,  असेही निर्देश दिले आहेत. 

रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करावी.  नोडल अधिकारी नेमावा. ज्या खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध असूनही ते उपलब्ध न करणाऱ्यावर कारवाई करावी. रुग्णसेवेसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करावेत, त्यांचे वेतन वेळेवर देण्यात यावे, तसेच त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. औरंगाबादेत झालेल्या अँटिजन टेस्टची देशपातळीवर दखल घेण्यात आल्याचे नमूद करीत कोरोनाविरोधातील या लढ्यात समर्पित कार्य करणाऱ्या आरोग्य, प्रशासकीय, स्वच्छता, पोलीस यांचे कौतुक करतानाच, अशीच कामगिरी यापुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सामूहिक प्रयत्नांतून कोविडवर मात करणे शक्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा विशेष उल्लेख करीत, संबंधित सर्व विभागांनी साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचे खंडपीठाने कौतुक केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून कोविडवर मात करणे शक्य होणार असल्याचे नमूद करीत खंडपीठाने ‘हम होंगे कामयाब’ या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला आहे. खंडपीठाने नेमलेल्या अमिकस क्युरी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी  या कामापोटीचे मानधन कोविड उपचारांकरिता देत असल्याची नोंदही खंडपीठाने घेतली. लातूर मनपाच्या वतीने अ‍ॅड. व्ही. डी. होन, औरंगाबाद मनपातर्फे अ‍ॅड. अंजली दुबे, नांदेड मनपाच्या वतीने अ‍ॅड. आर. के. इंगोले, अमळनेर नगर परिषदेच्या वतीने अ‍ॅड. गिरीश वाणी, तर अ‍ॅड. भरत वर्मा यांनी हस्तक्षेपकातर्फे काम पाहिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद