शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

कोरोनाविरुद्ध प्रभावी लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा; खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:40 IST

कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यातून २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करावी.उपलब्ध बेडची माहिती अद्ययावत ठेवून ते उपलब्धतेसाठी नियंत्रक नेमावेत. शुल्काबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करावी.

औरंगाबाद : कोविड-१९ विरोधात प्रभावी लढ्याकरिता  १२ जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. १८)  दिले आहेत.

कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करावी आणि त्या क्रमांकांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. खासगी रुग्णालयांमधून उपलब्ध बेडची माहिती अद्ययावत ठेवून ते उपलब्धतेसाठी नियंत्रक नेमावेत. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये समानता असावी. रुग्णांकरिता आवश्यक रुग्णवाहिका उपलब्ध असतील याची काळजी घ्यावी, तसेच त्यासंदर्भातील फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करावी,  असेही निर्देश दिले आहेत. 

रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करावी.  नोडल अधिकारी नेमावा. ज्या खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध असूनही ते उपलब्ध न करणाऱ्यावर कारवाई करावी. रुग्णसेवेसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करावेत, त्यांचे वेतन वेळेवर देण्यात यावे, तसेच त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. औरंगाबादेत झालेल्या अँटिजन टेस्टची देशपातळीवर दखल घेण्यात आल्याचे नमूद करीत कोरोनाविरोधातील या लढ्यात समर्पित कार्य करणाऱ्या आरोग्य, प्रशासकीय, स्वच्छता, पोलीस यांचे कौतुक करतानाच, अशीच कामगिरी यापुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सामूहिक प्रयत्नांतून कोविडवर मात करणे शक्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा विशेष उल्लेख करीत, संबंधित सर्व विभागांनी साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचे खंडपीठाने कौतुक केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून कोविडवर मात करणे शक्य होणार असल्याचे नमूद करीत खंडपीठाने ‘हम होंगे कामयाब’ या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला आहे. खंडपीठाने नेमलेल्या अमिकस क्युरी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी  या कामापोटीचे मानधन कोविड उपचारांकरिता देत असल्याची नोंदही खंडपीठाने घेतली. लातूर मनपाच्या वतीने अ‍ॅड. व्ही. डी. होन, औरंगाबाद मनपातर्फे अ‍ॅड. अंजली दुबे, नांदेड मनपाच्या वतीने अ‍ॅड. आर. के. इंगोले, अमळनेर नगर परिषदेच्या वतीने अ‍ॅड. गिरीश वाणी, तर अ‍ॅड. भरत वर्मा यांनी हस्तक्षेपकातर्फे काम पाहिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद