शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

मराठवाड्यात रोज ५ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचले प्रगणक; आतापर्यंत ६२ टक्के झाले काम 

By विकास राऊत | Updated: January 30, 2024 11:53 IST

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात केली असून, सहा दिवसांत रोज ५ लाख कुटुंबांपर्यंत प्रगणक पोहोचल्याचा दावा प्रशासन करीत आहे. ३० लाख कुटुंबांच्या पाहणीचे काम झाले असून, ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मुदत आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सोमवारी राज्य मागासवर्ग आयोगाने विभागीय आयुक्तालयात बैठक घेत ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

आयोगाचे सदस्य गजानन खराटे, डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. प्रा. गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, जि. प. सीईओ डॉ. विकास मीना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, उपायुक्त जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची उपस्थिती होती.

जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसेच लातूर आणि नांदेड महापालिका आयुक्त ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. सर्वेक्षणादरम्यान वारंवार येणाऱ्या अडचणी पाहून सर्वेक्षण ॲप अपडेट केले आहे. त्यामुळे जुन्या ॲपचा डेटा सेव्ह करून आणि डाऊनलोड केल्यानंतर जुने ॲप काढून टाका व सर्वेक्षण अपडेटेड नवीन १.३ ॲपद्वारे वापरण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. जमीन अधिग्रहणाचाही आढावा घेण्यात आला.

वेळ वाढवून देण्याची मागणीअधिकाऱ्यांनी सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी सदस्यांसमोर मांडल्या. सर्वेक्षणाच्या सुरुवातीलाच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याने सर्वेक्षणाची गतीच मंदावली. ॲप बरोबर चालत नाही, ग्रामीण भागात रेंज नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम फारसे झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक अधिकाऱ्यांनी केली. मराठवाड्यात ५० लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा, व्यवसाय, रोजगारासाठी स्थलांतरित व शेतवस्तीवरील कुटुंबातील सर्वेक्षण करून नोंद घ्यावी, वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रगणकाच्या संख्येत वाढ करावी. ३१ जानेवारीपर्यंत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

जिल्हा..... किती टक्के काम?छत्रपती संभाजीनगर ५३ टक्केजालना ५५ टक्केपरभणी ५५ टक्केहिंगोली ५५ टक्केबीड ५५ टक्केनांदेड ५५ टक्केधाराशिव ५५ टक्केलातूर ८४ टक्के

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद