शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

‘स्टार्टअप इंडिया’ प्रकल्प यशस्वीतेसाठी नवउद्योजकांचा विचार व्हावा

By साहेबराव हिवराळे | Updated: January 18, 2024 19:59 IST

बेरोजगारांच्या हाताला काम : छोट्या गाळ्यात उद्योग थाटल्याने जणू आकाश ठेंगणे

वाळूजमहानगर : नवउद्योजकांसमोर एक मोठा प्रश्न असतो तो उद्योगासाठी जागेचा. सहकारी संस्थेने अर्ज केल्यानंतर पाठपुरावा करत राहिले तरी नऊ-नऊ वर्षे भूखंड मिळत नाही, तोपर्यंत ती पिढीच गारद होते. शिक्षणानंतर तरुण उमेदीने पुढे येतात; पण पहिल्या पिढीला ‘स्टार्टअप’ मिळाले पाहिजे. त्यासाठी औद्योगिक भूखंड आरक्षित केले जावेत. त्यांना मिळणारे भूखंडही लांबवर कुठेतरी असतात. चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, पैठण, वैजापूर यासह महाराष्ट्रात रोजगार, स्वयंरोजगाराची संधी देण्यावर भर हवा, अशी अपेक्षा नवीन उद्योजकांतून व्यक्त होत आहे.

जागा नसल्याने अनेक नवउद्योजक जागा भाड्याने घेऊन उद्योग उभा करतात. त्यांना हक्काची जागा मिळाल्यास त्यांचाही उद्योगव्यवसाय नावारूपास येऊ शकतो. स्टार्टअप इंडियात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांचा विचार व्हावा, अन्यथा त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होते.

चहा विकणारा उद्योजक होतो तेव्हा..लघुउद्योग कमी जागेत चालत असले तरी तिथे हजार लोक काम करताना दिसतात. दुसरीकडे काही मोठ्या उद्योगांमध्ये शेकडो एकर जमीन असते; पण काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी असते. चहाची टपरीवाला एक युवक आहे. त्याने आता शेंद्र्यामध्ये गाळा घेतला आहे. तो दररोज एक हजार कप चहा विकतो. त्यावर त्याने घर बांधले, गाडी घेतली. शेंद्र्यातील संस्थेचा तो सभासद बनला आहे. एक स्टोव्ह घेऊन आलेला हा मुलगा आज उद्योजक बनला आहे. असे लोक या सहकारातून उभे राहिले आहेत.

बँकांचे सहकार्य अपेक्षित..सहकारी संस्थेचे सभासद झाल्यानंतर तिथे किमान दोनशे लोक उभे राहतात, त्यातून अनुभव उपयुक्त ठरतो. बँक सहकार्याला पुढे येते. मोठ्या उद्योजकांचे बळ मिळण्यास मदत होऊन तरुणांना व्यवसाय दृष्टिकोन बँकामुळे उभा करता येतो.

मोठे उद्योग येणार आहेत, तर लघू उद्योगांना बळ मिळेल...सरकार दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये मोठ्या उद्योगांना निमंत्रित करीत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा दिसणे आवश्यक आहे. मोठे उद्योग येणार आहेत तर त्यांना तिथे लघू उद्योगांचे बळ लागेलच. त्याशिवाय ते उभे राहणार नाहीत. लघू उद्योग येताना त्यांना सूक्ष्म उद्योगांचे सहकार्य आणि हे उद्योग उभे करण्यासाठी पायाभूत सुविधा हव्यात. मोठा भूखंड दिला तरी त्यात दोन, पाचशे असे सूक्ष्म उद्योग चालवणारे सामावून जातात. सहकाराच्या माध्यमातून सबलीकरण होते. लघू उद्योजकांना जगायचे असेल तर त्यांना किमान किमतीत भूखंड उपलब्ध करून द्यावा.-उद्योजक किरण दिंडे

भूखंड लघू उद्योगासाठीही असावेत...त्यांना लिलावात भूखंड घ्यावा लागला तर त्याची किंमत कुठल्या कुठे जाते. भूखंडच वीस लाख रुपयांत घ्यावा लागत असेल आणि त्याची गरज केवळ पाचशे चौरस फूट गाळ्याची असेल तर त्याची अडचण होते. हेच उद्योजक खरी रोजगारनिर्मिती करू शकतात.- उद्योजक अर्जुन आदमाने

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबाद