शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 29, 2014 01:08 IST

लातूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सर्वदूर पाऊस झाला असून, जवळपास दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिला होता.

लातूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सर्वदूर पाऊस झाला असून, जवळपास दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिला होता. त्यामुळे पिके सुकू लागली होती. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावल्याने या पिकांना जीवदान मिळाले आहे. तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे.जिल्ह्यातील जळकोट तालुका वगळता सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत अन्यत्र पाऊस झाला. लातूरसह रेणापूर, औसा, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, निलंगा, देवणी व अहमदपूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात लातूर जिल्ह्यात फक्त ४७.०७ मि.मी. पाऊस झाला, तर कालपर्यंत ११०.०७ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सरासरी ५.०१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत ११५.०८ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ६६.०५ टक्के आहे. सोमवारी दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. तरीही हा पाऊस समाधानकारक नाही. नद्या, ओढे, तलाव अद्यापही कोरडेच आहेत. तब्बल दोन ते अडीच तास पाऊस पडूनही पाणी जमिनीबाहेर आले नाही. शिरूर अनंतपाळ तालुक्याची पावसाची सरासरी ७५० मि.मी. असली, तरी आजपर्यंत केवळ २३१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर जिल्ह्याची २८ जुलैपर्यंतची पावसाची सरासरी ३३७.१ मि.मी.ची आहे. परंतु, आतापर्यंत फक्त ११५.८ मि.मी. पाऊस पडला आहे. जुलैअखेर यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. या आठही मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा अद्यापही ज्योत्याखालीच आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे. २५ जुलै रोजी जिल्ह्यातील लातूर तालुक्यात २.५० मि.मी., औसा तालुक्यात १.४२ मि.मी., रेणापूरमध्ये ०.७५, उदगीरमध्ये २.२८, चाकूरमध्ये २.२०, निलंग्यामध्ये १.३७, तर शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, अहमदपूर तालुक्यांत पाऊस निरंक होता. सोमवारी मात्र याही तालुक्यात पावसाची रिपरिप होती. त्यामुळे पिकांना सध्या तरी जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)पिकांना जीवदान...लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा ४ लाख ९७ हजार ९१८ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्सवर पेरा झाला आहे. त्याखालोखाल ९१ हजार ०३ हेक्टर्सवर तुरीची पेरणी झाली आहे. या सर्व पिकांसाठी पोषक पावसाची गरज आहे. सध्या रिपरिप झाल्यामुळे बळीराजासाठी दिलासा आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले, मात्र समाधानकारक पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे सध्याही शहरासह अनेक गावांत पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊसरिपरिप पावसामुळे पिकांना मिळाले जीवदानजळकोट तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र रिपरिप पाऊसबळीराजाला मिळाला दिलासा