शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Published: July 07, 2014 11:26 PM

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी दुपारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात बरसलेल्या पावसाची शासनदफ्तरी सरासरी १२़७८ मिमीची नोंद झाली आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी दुपारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात बरसलेल्या पावसाची शासनदफ्तरी सरासरी १२़७८ मिमीची नोंद झाली आहे़ तर सोमवारी दुपारीही उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली़ सर्वांसाठी दिलासादायक पाऊस झाला असला तरी पेरणीसाठी लागणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़चालू वर्षी पावसाने मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत़ तर ग्रामीणसह शहरी भागातही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत़पाऊस पडावा, यासाठी प्रत्येकजण देवाकडे साकडे घालत असल्याचे चित्र यंदाही दिसून येत होते़ जिल्हावासियांचे लक्ष लागलेल्या वरूणराजाने रविवारी जोरदार आगमन केले़ उस्मानाबादेत आठवडी बाजार असल्याने काही अंशी नागरिकांची हेळसांड झाली असली तरी पाऊस आल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते़ विशेषत: भूम, कळंब व वाशी तालुक्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली़ यात मंडळनिहाय पावसाची आकडेवारी पाहता (आकडेवारी मिलीमीटरमध्ये) उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद मंडळांतर्गत उस्मानाबाद शहर १६़२, ग्रामीण- १७़५०, ढोकी- १०, तेर - ५, पाडोळी ९, जागजी-११ तर बेंबळी व केशेगाव मंडळात प्रत्येक ५ मिमी पाऊस झाला़ लोहारा तालुक्यातील लोहारा-०६, जेवळी १३, माकणी- ०, परंडा तालुक्यातील परंडा येथे १०, सोनारी-१०, आनाळा-८, जवळा २६, आसू मंडळांतर्गत ५ मिमी पाऊस झाला़ भूम तालुक्यातील भूम - ५९, ईट येथे-०४, अंबी-०६, वालवड ७, माणकेश्वर येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली़ कळंब तालुक्यात कळंब ४७़०, ईटकूर-५, शिराढोण ३१, येरमाळा- १५, मोहा- ११, गोविंदपूर- २४, वाशी तालुक्यात वाशी २२, तेरखेडा- १५, पारगाव- १७, तुळजापूर तालुक्यात तुळजापूर- २१, जळकोट-०, नळदुर्ग-४, मंगरूळ-१८, सलगरा-१, सावरगाव-८, उमरगा तालुक्यात उमरगा शहर-९, मुरूम-६, नारंगवाडी-२, दाळींब-४ इतर तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ रविवार पाठोपाठ सोमवारीही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी लागणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ (प्रतिनिधी)गेल्या चोवीस तासात झालेला व एकूण तालुकानिहाय पाऊसतालुकाआजचा पाऊसएकूण पाऊसउस्मानाबाद९.६०५०तुळजापूर७.४०४५.३उमरगा४.२०४६.८लोहारा६.३०६२.७भूम२२.४०५३.४कळंब२२.१०५१.६परंडा१२.२०५७.२वाशी१८.००५२.७एकूण१२.७८५२.४५वीज गुलभूम तालुक्यातील ईट व परिसरात रविवारी दुपारी, रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ वादळी वाऱ्यात बरसलेल्या पावसामुळे ईटसह परिसरातील जवळपास १० ते १५ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला़ जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती होती़