शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

‘अ‍ॅग्रो टुरिझम’मुळे मिळतोय ‘एनर्जी बुस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 7:34 PM

आऊटिंगच्या माध्यमातून वाढतेय निसर्ग सान्निध्य

- अबोली कुलकर्णी

औरंगाबाद : धकाधकीचे जीवन आणि कामाच्या व्यापामुळे आयुष्यातील चार निवांत क्षण कुटुंबासोबत जगण्यासाठी प्रत्येक जण संधी शोधत असतो. मग वीकेंडला असलेल्या सुटीचा पुरेपूर उपभोग घ्यायचा म्हणून कुठेतरी आऊटिंगला जाऊ असे विचार डोक्यात येऊ लागतात. अशावेळी निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी ठिकाणे आकर्षित करू लागतात. मुंबई-पुण्याची वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याची संकल्पना आता औरंगाबादेतही रुजू पाहतेय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामीण भागातील शेती, निसर्गसौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, दुर्मिळ झाडे, थंडगार सावली, विहीर, तलाव, जुनी घरे यांच्या सान्निध्यात जाऊन राहण्याचा आनंद काही औरच असतो. शहरात स्थायिक झालेली प्रत्येक व्यक्ती ही मजा क्षणोक्षणी ‘मिस’ करते. मात्र, मुंबई-पुणे येथे वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याचा ट्रेंडच आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंब, मित्र परिवार यांच्यासोबत रिलॅक्स होण्यासाठी दोन दिवस निसर्गरम्य ठिकाणी जातात. आता हाच ट्रेंड औरंगाबादेत रुजू पाहतोय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळताना दिसत आहे. या संकल्पनेंतर्गत विविध सोहळे, प्री-वेडिंग फोटोशूट, गेट टुगेदर, समारंभ, पार्टी यांचे आयोजन करता येते. आठवडाभराच्या कामासाठी दोन दिवसांचे ‘एनर्जी बुस्ट’ या ट्रेंडमुळे मिळते.

चिकूच्या बागेत डोहाळ जेवण, व्याही भोजन‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेंतर्गत शहराच्या बाहेर ठराविक हेक्टरच्या परिसरात झाडे, फुले, जुनी घरे, खेळण्या, वेगवेगळे खेळ, चिकूच्या बागा, विहिरी, बलुतेदारी यांच्या माध्यमातून त्या जागेला ग्रामीण टच देण्यात येतो. अशा ठिकाणी डोहाळ जेवण, व्याही भोजन, गेट टुगेदर, वाढदिवस, सहस्रचंद्रदर्शन, किटी पार्टी, भिशी पार्टी, शालेय सहली, घरगुती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जातात. शांत, निवांत जागी चार आनंदाचे क्षण अनुभवल्याचा आनंदही लुटता येतो. 

ग्रामीण टचवाढते शहर, प्रदूषण, धकाधकीचे आयुष्य यांच्यामुळे प्रत्येकाला स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ द्यायचा असतो. अ‍ॅग्रो टुरिझम या ताणावर अगदी योग्य उपाय झाला आहे. वेगवेगळी शक्कल लढवीत व्यावसायिक आऊटिंग अगदी नैसर्गिक ठेवतात. अगदी ग्रामीण टच ठेवून व्यवस्था असल्याने तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळ जाता.

टॅग्स :tourismपर्यटनagricultureशेतीFarmerशेतकरी