शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
3
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
4
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
5
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
6
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
7
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
8
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
9
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
11
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
12
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
13
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
15
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
16
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
17
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
18
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
19
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
20
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 

‘अ‍ॅग्रो टुरिझम’मुळे मिळतोय ‘एनर्जी बुस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:35 IST

आऊटिंगच्या माध्यमातून वाढतेय निसर्ग सान्निध्य

- अबोली कुलकर्णी

औरंगाबाद : धकाधकीचे जीवन आणि कामाच्या व्यापामुळे आयुष्यातील चार निवांत क्षण कुटुंबासोबत जगण्यासाठी प्रत्येक जण संधी शोधत असतो. मग वीकेंडला असलेल्या सुटीचा पुरेपूर उपभोग घ्यायचा म्हणून कुठेतरी आऊटिंगला जाऊ असे विचार डोक्यात येऊ लागतात. अशावेळी निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी ठिकाणे आकर्षित करू लागतात. मुंबई-पुण्याची वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याची संकल्पना आता औरंगाबादेतही रुजू पाहतेय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामीण भागातील शेती, निसर्गसौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, दुर्मिळ झाडे, थंडगार सावली, विहीर, तलाव, जुनी घरे यांच्या सान्निध्यात जाऊन राहण्याचा आनंद काही औरच असतो. शहरात स्थायिक झालेली प्रत्येक व्यक्ती ही मजा क्षणोक्षणी ‘मिस’ करते. मात्र, मुंबई-पुणे येथे वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याचा ट्रेंडच आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंब, मित्र परिवार यांच्यासोबत रिलॅक्स होण्यासाठी दोन दिवस निसर्गरम्य ठिकाणी जातात. आता हाच ट्रेंड औरंगाबादेत रुजू पाहतोय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळताना दिसत आहे. या संकल्पनेंतर्गत विविध सोहळे, प्री-वेडिंग फोटोशूट, गेट टुगेदर, समारंभ, पार्टी यांचे आयोजन करता येते. आठवडाभराच्या कामासाठी दोन दिवसांचे ‘एनर्जी बुस्ट’ या ट्रेंडमुळे मिळते.

चिकूच्या बागेत डोहाळ जेवण, व्याही भोजन‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेंतर्गत शहराच्या बाहेर ठराविक हेक्टरच्या परिसरात झाडे, फुले, जुनी घरे, खेळण्या, वेगवेगळे खेळ, चिकूच्या बागा, विहिरी, बलुतेदारी यांच्या माध्यमातून त्या जागेला ग्रामीण टच देण्यात येतो. अशा ठिकाणी डोहाळ जेवण, व्याही भोजन, गेट टुगेदर, वाढदिवस, सहस्रचंद्रदर्शन, किटी पार्टी, भिशी पार्टी, शालेय सहली, घरगुती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जातात. शांत, निवांत जागी चार आनंदाचे क्षण अनुभवल्याचा आनंदही लुटता येतो. 

ग्रामीण टचवाढते शहर, प्रदूषण, धकाधकीचे आयुष्य यांच्यामुळे प्रत्येकाला स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ द्यायचा असतो. अ‍ॅग्रो टुरिझम या ताणावर अगदी योग्य उपाय झाला आहे. वेगवेगळी शक्कल लढवीत व्यावसायिक आऊटिंग अगदी नैसर्गिक ठेवतात. अगदी ग्रामीण टच ठेवून व्यवस्था असल्याने तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळ जाता.

टॅग्स :tourismपर्यटनagricultureशेतीFarmerशेतकरी