शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘समांतर’ची साडेसाती संपेना; आता मनपा आयुक्त सुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:08 IST

शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नाहीत.

ठळक मुद्देसमांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे.कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.

औरंगाबाद : शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नसल्याने सत्ताधाऱ्यांना हा विषय आता पुन्हा पुढे  ढकलण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे ‘समांतर’ला शनिची वक्रदृष्टी लागली असल्याचे दिसत आहे. 

शहरातील १५ लाख नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे. कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. आयुक्त डॉ. विनायक यांनी मागील महिन्यातच समांतर जलवाहिनीसंदर्भात सर्वसाधारण सभेसमोर ठराव मांडला आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी कायगाव येथे पहिली आत्महत्या झाल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. ६ आॅगस्ट रोजीही सत्ताधाऱ्यांनी दिवसभर सर्वसाधारण सभा चालवूनही समांतरवर चर्चा केली नाही. शनी अमावास्येच्या दिवशी म्हणजेच ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शनी अमावास्या आमच्यासाठी चांगली असल्याची प्रतिक्रियाही महापौरांनी नोंदविली होती.

शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीन दिवसांची सुटी टाकली आहे. त्यांना वैयक्तिक कारणासाठी मालेगाव, चंदीगढ येथे जायचे आहे. शनिवारी सकाळीच ते रवाना होणार आहेत. आपण सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकणार नाही, याची पूर्वसूचना महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग किंवा डी. पी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्ताधाऱ्यांना सभा चालवावी लागेल. समांतरचा मूळ ठराव आयुक्तांनी ठेवला असल्याने त्यांच्या उपस्थितीतच चर्चा व्हावी अशी नगरसेवकांची मागणी आहे. सभेत आयुक्त उपस्थित राहणार नसल्याने दुसऱ्या विषयांवरच चर्चा अपेक्षित आहे.

समांतरने वर्षभरात शहरात पाणीयेत्या वर्षभरात जायकवाडी धरणातून समांतरने शहरात पाणी आणल्या जाईल, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी येथे दिली. ‘क्रेडाई’ बांधकाम व्यावसायिकांच्या स्थानिक शाखेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी, महापौर नंदकुमार घोडेले यांनी समांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना परदेशी म्हणाले की, समांतरमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. यासंदर्भात बैठकाही घेतल्या आहेत. पुढील नियोजन लक्षात घेता येत्या वर्षभरात समांतरने पाणी शहरात आणल्या जाईल, अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद