शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

वीजेच्या तारेला चिटकून तरूण शेतकऱ्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:26 IST

शेतात मशागतीचे काम करताना शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेल्या मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून ३५ वर्षीय शेतकऱ्याचा रविवारी दुपारच्या सुमारास जरंडी येथे दुर्दैवी मृत्यू झाला.

सोयगाव : शेतात मशागतीचे काम करताना शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेल्या मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून ३५ वर्षीय  शेतकऱ्याचा रविवारी दुपारच्या सुमारास जरंडी येथे दुर्दैवी मृत्यू झाला.

अमोल अशोक पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात चार दिवसांपासून महावितरणच्या शेती पंपाच्या  मुख्यावीज वाहिनीची वीजतार अमोल यांच्या शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेली होती. शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही वीज तार रात्रीच झाडावरून जमिनीवर पडली आणि भीज पावसात जमिनीत पुरल्या गेली.

अमोल हे नेहमीप्रमाणे वीजेची तार झाडावर असल्याचे समजून मोसंबी पिकाच्या नुकसानीची मशागत करत असतानाच अचानक त्यांच्या पायाला वीजेची तार लागली. तार हाताने काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा तारेला चिटकून जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी शिताफीने त्यांना वीजतारेच्या कचाट्यातून बाहेर काढले.

चार दिवसांपासून परिसरातील शेतकरी तुटलेली वीज  तार जोडण्यासाठी महावितरण विभागाला कळवत होते.  मात्र महावितरण विभागाकडून कुणीही  दुरूस्तीसाठी आले नाही. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप  शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अमोल यांचा मृतदेह तासभर महावितरणच्या सोयगाव कार्यालयासमोर आणून ठेवला. परंतु अखेरीस पोलिसांनी  मध्यस्ती करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी मृत शेतकऱ्याचे मामा तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फिर्याद दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक युवराज शिंदे, जमादार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, संदीप चव्हाण आदी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूelectricityवीज