शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जमिनीवर बसले ठाण मांडून; मराठवाड्यातील ८३ हजार अतिक्रमणधारकांना नोटिसा

By बापू सोळुंके | Updated: July 1, 2023 20:02 IST

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांत या अतिक्रमणांमुळे शासकीय गायरानच शिल्लक राहिले नाही.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल ८३ हजार ६८५ जणांनी शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधल्याचे निष्पन्न झाले आहे. या अतिक्रमणधारकांना संबंधित तहसील कार्यालयांनी नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील विविध गावांत या अतिक्रमणांमुळे शासकीय गायरानच शिल्लक राहिले नाही. शासनाला गावासाठी एखादा प्रकल्प हाती घ्यायचा असेल आणि त्यासाठी इमारत बांधायची असेल तर तेथे शासकीय जमीन मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मराठवाड्यातील आठ जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देणे जानेवारीपासून सुरू केले. याअंतर्गत ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार अतिक्रमणधारक म्हणून नोंद असलेल्या ५९५६३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. नोटिसा बजावल्यानंतर प्रशासनाच्या वतीने संबंधित गावात अतिक्रमणाची शहानिशा करण्यात आली. तेव्हा प्रत्यक्षात अतिक्रमणधारकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणानुसार विविध जिल्ह्यांत दर्शविण्यात आलेल्या अतिक्रमणधारकांच्या संख्येपेक्षा कितीतरी पट अधिक अतिक्रमणधारक गायरान जमिनीवर ठाण मांडून आहेत. या सर्व २९ हजार ५५२ जणांनाही नोटिसा बजावण्यात आल्या. यामुळे आता अतिक्रमणधारकांची एकूण संख्या ८३६८५ आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती अतिक्रमणधारक?औरंगाबाद जिल्ह्यात १७ हजार ५७१, जालना २७ हजार ८४६, परभणी ३६८६, हिंगोली १५२३, नांदेड ३९६७, बीड ७८८६ तर लातूर १९ हजार ६३४ आणि धाराशिव जिल्ह्यात १५७२ अतिक्रमणधारक आढळून आले आहेत. या सर्वांना प्रशासनाने नोटिसा बजावल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

आई-वडिलांच्या काळापासून येथेच राहतो, आमचे घर नियमित करामराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांनी नोटिसांना उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे. ५ टक्के लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. उर्वरित लोकांनी प्रशासनाला उत्तर देताना आम्ही आई-वडिलांच्या काळापासून येथे राहतो, आम्हाला राहण्यास घर नाही. आमची घरे शासनाने नियमित करावी, अशी मागणी केली आहे.

जालना जिल्हा प्रशासनाची लपवाछपवीजालना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात केवळ ४ हजार ८० अतिक्रमणधारक असल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्ष सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात आणखी २३७६६ जण गायरान जमिनीवर बेकायदा घरे बांधून राहत असल्याचे आढळून आले. त्यांनाही प्रशासनाने नोटिसा बजावल्या.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागMarathwadaमराठवाडा