शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण; परस्पर उभारले ४१ उद्योग

By बापू सोळुंके | Updated: March 12, 2025 19:45 IST

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या घाणेगाव, परदेशवाडी, साजापूर, करोडी, तीसगाव, केसापुरी इ. गावांसाठी ५० वर्षांपूर्वी शासनाने विविध लघुसिंचन तलाव, गाव तलाव बांधले होते.

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीपासून जवळच असलेल्या घाणेगाव येथील लघुसिंचन तलावासाठी ५० वर्षांपूर्वी संपादित जमिनी तेव्हाच सरकारच्या नावे करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आजही मूळ मालकाच्या वारसदारांच्या नावे असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनींची परस्पर खरेदी-विक्री होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यासोबतच जलसंपदा विभागाच्या मालकीच्या जमिनींवर तब्बल ४१ लघुउद्योग सुरू आहेत. ही बाब निदर्शनास येताच जलसंपदा विभागाने ४१ उद्योजकांना नोटिसा बजावल्या.

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या घाणेगाव, परदेशवाडी, साजापूर, करोडी, तीसगाव, केसापुरी इ. गावांसाठी ५० वर्षांपूर्वी शासनाने विविध लघुसिंचन तलाव, गाव तलाव बांधले होते. या तलावांसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करून तेव्हाच त्यांना मोबदलाही दिला होता. मात्र तत्कालीन भूसंपादन अधिकाऱ्यांनी या जमिनीच्या सातबाऱ्यावरील मूळ जमीन मालकाचे नाव कमी करून जलसंपदा विभागाचे नाव लावण्याकडे दुर्लक्ष केले होते. चारीसाठीही शासनाकडून जमीन संपादित करण्यात येते. घाणेगाव येथील चारीवर अतिक्रमण झाल्याचे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मनीष निरंजन यांच्या लक्षात आले. शिवाय तलावासाठी संपादित जमिनीवर ४२ लघुउद्योग दिसले.

शहरालगतच्या गावांतील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने आपल्या जमिनी कुठे आहेत आणि त्या जमिनींच्या मालकी हक्काची काय अवस्था आहे, याची शोधमोहीम त्यांनी हाती घेतली. घाणेगाव तलावाच्या ४५ टक्के जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. विविध गटातील संपादित जमिनी मूळ मालकांच्या वारसदारांच्या नावे आहेत. वारसदारांनी परस्पर जमिनीची विक्री केली. हा मोठा घोटाळा असल्याने त्यांनी आणखी दोन अधिकाऱ्यांना कामाला लावले आणि तहसील कार्यालयातून भूसंपादनाची मूळ कागदपत्रे मिळविली. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सर्वप्रथम अतिक्रमित जमिनी शासनाच्या नावे करण्यास प्राधान्य दिले. घाणेगाव तलावासाठी गट नंबर ४६ मधील संपादित ८ एकर ३५ गुंठे जमिनीवर ४१ लघुउद्योग दिसले. हे अतिक्रमण काढण्यासाठी उद्योजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

प्रक्रिया सुरू केली आहेशहरालगतच्या विविध गावांसाठी जलसंपदा विभागाने ५० वर्षांपूर्वी तलाव बांधले होते. या तलावांसाठी जमिनी संपादित केल्यानंतर संबंधित जमीन मालकांना पैसेही दिले होते. मात्र या जमिनी शासनाच्या नावे करण्यास तत्कालीन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, आज या जमिनी एकर तर संबंधित शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या नावे आहेत किंवा त्यांनी विक्री केल्या आहेत. शिवाय या जमिनींवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले. ही अतिक्रमणे काढणे आणि संपादित जमिनी जलसंपदा विभागाच्या नावे करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली.- मनीष निरंजन, उपविभागीय अभियंता, जलसंपदा

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमण