शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गायरान जमिनीवरील अतिक्रमण सरपंचास भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:05 IST

आळंद : शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करणे उमरावतीच्या सरपंच तस्लीमबी अक्रम पठाण यांना चांगलेच महागात पडले. त्यांनी अतिक्रमण केल्याचे ...

आळंद : शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करणे उमरावतीच्या सरपंच तस्लीमबी अक्रम पठाण यांना चांगलेच महागात पडले. त्यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने औरंगाबाद हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत सरपंच पठाण यांना पदावरून पायउतार केले. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

उमरावती ग्रामपंचायतीची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. यात तस्लीमबी अक्रम पठाण या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केले असल्याची तक्रारी गावातील सादिक हुसेन पठाण यांनी २२ नोव्हेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती. यात सरपंच तस्लीमबी पठाण, त्यांचे पती अक्रम पठाण आणि सासरे नयनखा पठाण यांनी उमरावती येथील गट क्रमांक ५७६मध्ये अतिक्रमण करून ४८ बाय ६८ फूट अतिक्रमण करून व्यवसायासाठी संबंधित जागेवर पक्के बांधकाम केलेले होते. परंतु, निवडणूक प्रपत्र भरताना ही माहिती त्यांनी लपवत शासनाची फसवणूक केली असून, त्यांचे पद रद्द करण्याची मागणी सादिक पठाण यांनी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी फुलंब्री तहसीलदार, आळंद मंडळ आधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे २२ जुलै २०१९ रोजी सरपंच तस्लीमबी पठाण यांना अपात्र घोषित केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात सरपंच पठाण यांनी औरंगाबाद खंडपीठात संबंधित शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण हे माझे सासऱ्यांनी केले असून, त्यांच्याशी माझा व माझ्या पतीचा संबंध नसल्याचा दावा दाखल केला होता. यासह माझे कुटुंब सासऱ्यापासून विभक्त राहत असल्याने त्यांनी केलेल्या अतिक्रमणाशी माझा संबंध नसल्याने मला अपात्र ठरवू नये, असा दावा केला होता. याबाबत सादिक हुसेनखा पठाण यांनी दाखल केलेल्या दाव्यात सरपंच, त्यांचे पती आणि सासरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर रेशन कार्ड वेगवेगळे केले असून, अतिक्रमण केलेल्या जागेवर सरपंच तस्लीमबी पठाण यांचे पती व्यवसाय करीत असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयात सुनावणी होऊन ते अतिक्रमण सरपंचाचेच असल्याचे सिद्ध झाल्याने औरंगाबाद हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत सरपंच तस्लीमबी पठाण यांना अपात्र घोषित केले आहे. न्यायालयात तस्लीमबी पठाण यांच्यातर्फे अमोल चालक तर अर्जदारातर्फे देवदत्त पालोदकर यांनी काम पाहिले.