शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

अतिक्रमणे रात्री काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:58 IST

शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून अतिक्रमण केलेल्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात येईल. यानंतरही अतिक्रमण न काढल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांवरून दुचाकी, चारचाकी वाहने सहज ये-जा करू शकतील एवढा रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यात येणार आहे.शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण हटाव पथकाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून दररोज विविध रस्त्यांवर पथक फिरविण्यात यावे.नागरिकांना, वाहनधारकांना अजिबात त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर प्रशासकीय विभागाची यंत्रणा लगेच कामाला लागली. शनिवारी एका जीपवर युद्धपातळीवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आला. सायंकाळी सहा वाजता प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग, पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, गवळी आदी कर्मचाºयांचा ताफा महापौरांनी रवाना केला.या पथकाने पोलिसी बंदोबस्तात शहागंज चमनपासून स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. महापालिकेचा ताफा पाहताच रस्त्यांवरील हातगाड्या, फेरीवाले सैरावैरा पळू लागले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे शहरातील त्रस्त नागरिकांनाही हायसे वाटले. पथकाने शहागंज चमनचा श्वास चारही बाजंूनी मोकळा केल्यावर मोर्चा गांधी पुतळा सिटीचौककडे वळविला.सिटीचौक ते गुलमंडी आणि नंतर पैठणगेटपर्यंत अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरीवाल्यांना उद्यापासून रस्त्यावर याल तर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी रस्त्यांवरच खुर्च्या, हातगाड्या लावल्या होत्या. हे सर्व साहित्य महापालिकेच्या पथकाने जप्त केले. महापालिकेला हा उपक्रम राबविण्यासाठी एक रुपयाही खर्च आला नाही. फक्त उपलब्ध यंत्रणेला कामाला लावण्यात आले.व्यापाºयांसह नागरिकही आनंदीनोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापाºयांचे कंबरडे मोडले आहे. गुलमंडी, रंगारगल्ली, टिळकपथ, पैठणगेट येथे व्यापाºयांनी लाखो रुपये भाडे भरून दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांसमोर २४ तास हातगाड्या, फेरीवाल्यांचा मुक्त संचार असतो.दुकानात येणाºया ग्राहकाला दुचाकी वाहनही उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे मनपाच्या कारवाईचे व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महापालिकेची सायंकाळी सुरू झालेली कारवाई पाहून दुचाकी वाहनधारकांनी मनपाच्या पथकाचे आभार मानले.