शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अतिक्रमणे रात्री काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:58 IST

शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याची प्रक्रिया शनिवारपासून महापालिकेने सुरू केली. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून अतिक्रमण केलेल्या छोट्या-छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करण्यात येईल. यानंतरही अतिक्रमण न काढल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांवरून दुचाकी, चारचाकी वाहने सहज ये-जा करू शकतील एवढा रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यात येणार आहे.शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिक्रमण हटाव पथकाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत. एका वाहनावर ध्वनिक्षेपक लावून दररोज विविध रस्त्यांवर पथक फिरविण्यात यावे.नागरिकांना, वाहनधारकांना अजिबात त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर प्रशासकीय विभागाची यंत्रणा लगेच कामाला लागली. शनिवारी एका जीपवर युद्धपातळीवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आला. सायंकाळी सहा वाजता प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग, पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, गवळी आदी कर्मचाºयांचा ताफा महापौरांनी रवाना केला.या पथकाने पोलिसी बंदोबस्तात शहागंज चमनपासून स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली. महापालिकेचा ताफा पाहताच रस्त्यांवरील हातगाड्या, फेरीवाले सैरावैरा पळू लागले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे शहरातील त्रस्त नागरिकांनाही हायसे वाटले. पथकाने शहागंज चमनचा श्वास चारही बाजंूनी मोकळा केल्यावर मोर्चा गांधी पुतळा सिटीचौककडे वळविला.सिटीचौक ते गुलमंडी आणि नंतर पैठणगेटपर्यंत अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरीवाल्यांना उद्यापासून रस्त्यावर याल तर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी रस्त्यांवरच खुर्च्या, हातगाड्या लावल्या होत्या. हे सर्व साहित्य महापालिकेच्या पथकाने जप्त केले. महापालिकेला हा उपक्रम राबविण्यासाठी एक रुपयाही खर्च आला नाही. फक्त उपलब्ध यंत्रणेला कामाला लावण्यात आले.व्यापाºयांसह नागरिकही आनंदीनोटाबंदी, जीएसटीने अगोदरच व्यापाºयांचे कंबरडे मोडले आहे. गुलमंडी, रंगारगल्ली, टिळकपथ, पैठणगेट येथे व्यापाºयांनी लाखो रुपये भाडे भरून दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांसमोर २४ तास हातगाड्या, फेरीवाल्यांचा मुक्त संचार असतो.दुकानात येणाºया ग्राहकाला दुचाकी वाहनही उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे मनपाच्या कारवाईचे व्यापाºयांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महापालिकेची सायंकाळी सुरू झालेली कारवाई पाहून दुचाकी वाहनधारकांनी मनपाच्या पथकाचे आभार मानले.