शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पन्नालालनगरमध्ये वळविला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:54 IST

पन्नालालनगर येथे एका बिल्डरने नाल्याचा प्रवाहच बदलला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमाफियांनी नाला बळकावून त्यावर टोलेजंग इमारत बांधली तरी महापालिका या विरोधात ‘ब्र’अक्षरही काढत नाही. महापालिकेच्या या संयमी भूमिकेमुळे शहरातील असंख्य नाल्यांवर मोठ-मोठ्या इमारती दिमाखात उभ्या आहेत. शहरात मोठा पाऊस झाल्यास नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. नाल्यातील अतिक्रमणे काढण्याचा मुद्दा महापालिकेत गाजत असतानाच पन्नालालनगर येथे एका बिल्डरने नाल्याचा प्रवाहच बदलला आहे. या स्तुत्य उपक्रमाला महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदारही मदत करीत असल्याचे समोर आले आहे.क्रांतीचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी शनिवारी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पन्नालालनगर येथे वीज कंपनीच्या कार्यालयासमोरील जागेसंदर्भात वकील व इतर मंडळींचा वाद सुरू आहे. या वादासंदर्भात अंतिम निर्णय झाला नाही. एका बांधकाम व्यावसायिकाने वादग्रस्त जागेवर बांधकाम सुरू केले आहे. या जागेतून जाणाºया नाल्याचा नैसर्गिक प्रवाहच बदलण्यात आला आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदार मदत करीत आहेत. कंत्राटदार या भागात अत्यंत छोटे पाईप टाकत आहेत. मोठा पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे, असे वाडकर यांनी म्हटले आहे.